नागपूर: सोमवारी नागपूरमध्ये विधानसभेच्या अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्र घेत सरकारला धारेवर धरले आहे. पहिल्या दिवशी सावरकरांच्या मुद्यावरून तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. आजच्या कामकाजाला सुरवात होण्यापूर्वी भाजप आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ‘सामना’चे फलक हातात घेऊन निदर्शने केली आहेत.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई दिलीच पाहिजे या मागणी साठी विरोधकांकडून हि निदर्शने करण्यात आली आहेत. तर यावेळी ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’ अशा घोषणा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजप आमदारांनी टीका केली आहे.
दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकरी नुकसान भरपाईचा मुद्दा आक्रमक पाने मांडला होता. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत कामकाज तहकूब करण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात आली होती. या मुद्दयावर चर्चा सुरु असताना सभागृहात आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी हाच मुद्दा घेत आक्रमक पवित्र घेतला आहे.
यावेळी भाजपनेते आशिष शेलार यांनी दिलेल्या ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ या हाकेला ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे अशी मागणीसुद्धा यावेळी भाजप आमदारांनी केली.