मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्या तरी त्याबद्दल अधिक विचार न करता विधानसभेत पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा विचार करा, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले.
राज्यात बेरोजगारी वाढत आहे. कोणताही घटक सरकारवर संतुष्ट नाही. स्वतःच्या मंत्र्यांच्या चुकीच्या गोष्टी झाकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत. शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. अशावेळेस आपण सर्वांनी चांद्यापासून-बांद्यापर्यंत फिरून लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. जनाधार वाढवला पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.
आज महाराष्ट्रातला एकही घटक समाधानी नाही. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात एकही नवा प्रकल्प आलेला नाही, बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे, अनेक पदे रिक्त आहेत पण भरली जात नाहीत, आपलं सरकार येताच या सगळ्या रिक्त जागा आपण भरून काढू, असे आश्वासन पवारांनी दिले.