मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा वरून राजकारण सुरु झाले आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधी बाकावरील नेत्यानावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले,’शिवसेना पक्षाचा धर्म आणि स्वभाव जशाला तसे उत्तर देणं. आणि शिवसेना पक्ष नेहमीच जशास तसं उत्तर आम्ही नेहमीच देत असतो, हे आमचं बाळकडू आहे.
शिवसेना पक्ष प्रमुखांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी सर्वांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व खासदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी काही नक्कीच सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन नक्कीच योग्य पद्धतीने होईल.
ते पुढे म्हणाले,’महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं देखील बोलून दाखवलं. यावेळी राज ठाकरे यांचा सभांबाबत अप्रत्यक्षपणे ते म्हणाले,आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत.’ असं म्हणत राऊत यांनी भाजप पक्ष आणि राज राज ठाकरेंवर टीका केली.