Raj Thackeray : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघात प्रकरण आमदार रोहित पवार यांनी लावून धरले आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. आज २७ फेब्रुवारीला रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विमान अपघात प्रकरणावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. ही भेट तासभर होती, यानंतर राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर सविस्तर भाष्य करत पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. राज यांनी प्ररखडपणे आपली भूमिका मांडली आहे. पोलीस रोहित पवारांचा FIR का घेत नाहीत, सरकारच संशयाची भूतं नाचवतंय, असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. सुनेत्रा वहिनी, मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे असे देखील राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूत फिरत आहेत. अपघात हा धुक्याने झाला की धोक्याने असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांची तक्रार नोंदवली जात नसल्यावर राज यांनी भाष्य केले. ते म्हणाले, त्यांनी रोहित पवार तीन ठिकाणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण पोलीस तक्रार घेत नाही, गुन्हा दाखल करत नाहीत. इथेच संशय तयार होतो. FIR नोंदवायला गेलेला माणूस त्याची तक्रार घेतली जात नाही मग यातच काळ बेरं आहे का? असा सवाही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. हे राजकारण नाही आहे, राजकारण बाजूला ठेवूया पण FIR करू का देत नाही. सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यात ही गोष्ट मांडावी. लोकसभेचेही अधिवेशन आहे, तिथेही राष्ट्रवादीच्या लोकांनी मुद्दे मांडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. अजित पवार यांच्यासारख्या माणसाचा अपघात आहे, आणि त्यासाठी FIR करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव का आहे? एकच FIR आहे ना फक्त, त्यावर सरकार का घाबरत आहे. सुनेत्रा वहिनींनी यावर बोलले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तर बोलले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. एकप्रकारे राज ठाकरे यांनी रोहित पवारांनी विमान अपघात प्रकरणी पाठिंबा दर्शवत भूमिका मांडली आहे. हेही वाचा : Hair Care Tips: पुन्हा-पुन्हा होणाऱ्या डँड्रफने हैराण? कडुनिंबाचे हे ४ घरगुती उपाय डँड्रफ करतील दूर