नवी दिल्ली – एआयएमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कारवाई केली आहे. वारीस पठाण यांना सार्वजनिक बोलण्यास बंदी घातली आहे.
आम्ही 15 कोटी आहोत, परंतु 100 कोटींना भारी आहोत, असे बेताल वक्तव्य वारीस पठाण यांनी केले होते. याविरोधात असदुद्दीन ओवेसी यांनी पक्ष आदेश देईपर्यंत वारिस पठाण यांनी माध्यमात काहीही बोलू नये, असे सांगितले आहे. तर औरंगाबादचे खासदार खासदार इम्तियाज जलील यांनी वारीस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचे सांगितले. मात्र, पठाण यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन माघार घेण्यास नकार दिला आहे. मी जे काही बोललो आहे ते संविधानाच्या चौकटीत आहे, त्यामुळे मी माफी मागणार नाही, अशी भूमिका वारीस पठाण यांनी घेतली आहे.
काय म्हणाले होते वारीस पठाण?
केवळ शब्दाला शब्दांनी उत्तर देता येणार नाही, ‘इट का जवाब पत्थर से’ आता आम्ही शिकलोय. आम्हाला सोबत चालावे लागेल. स्वातंत्र्य मागितल्याने मिळत नाही, ते हिसकावून घावे लागते. आम्ही आत फक्त महिलांना पुढे केले आहे, सगळ्या वाघिणी बाहेर निघाल्या तरी तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही जर सगळे सोबत आलो तर काय होईल? या पूर्वीही असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे.