शिक्रापूर – उपराष्ट्रपती श्री एम वेंकय्या नायडू यांनी राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान केलेल्या चुकीच्या विधानाचा निषेध व्यक्त करत शिक्रापूर येथील युवकांनी वेंकय्या नायडूंना शिक्रापुरातून तीनशे पत्रे पाठवून निषेध व्यक्त केला आहे.
उपराष्ट्रपती श्री एम वेंकय्या नायडू यांनी राज्यसभा खासदारांच्या शपथ विधी दरम्यान जय भवानी जय शिवाजी या घोषणेला आक्षेप घेत हे माझ चेंबर आहे तुमच घर नाही असे वक्तव्य करत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस मयूर करंजे, रामदास भुजबळ, विजय काळे, रवींद्र पाटील यांसह आदींनी एकत्र येत उपराष्ट्रपती श्री एम वेंकय्या नायडू यांना जय भवानी जय शिवाजी, जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी हे वाक्य पोस्ट कार्ड वर लिखाण करून त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयीन पत्त्यावर पाठवली आहेत, तर युवकांनी उपराष्ट्रपती श्री एम वेंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती श्री एम वेंकय्या नायडू यांनीयांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. तर यावेळी बोलताना छत्रपती महाराजांबद्दल कोणीही बोलेल त्याची गय केली जाणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस मयूर करंजे यांनी सांगितले.