आळंदी -करोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आषाढी पायी वारीचा सोहळा रद्द झाला आहे. पालखी तळांवर प्रातिनिधीतक वारीचे स्वागत केले जात आहे.
दरम्यान, आता माऊलींना विठू भेटीची ओढ लागली असून आता केवळ नऊच दिवस आजोळ घरी पादुकांचा मुक्काम असल्याने विठू भेटीची वेळ समीप आली आहे.
करोनामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार संतांच्या पालख्या पंढरीकडे पायीवारीतून न जाता या एसटी महामंडळाच्या लालपरीतून सोमवारी (दि. 19) पंढरीकडे मार्गस्थ होणार आहेत.
त्यानुसार शुक्रवारी (दि. 2) माऊलींच्या पालखीचे हरिनाम गजरात अलंकापुरी येथील देऊळवाड्यात मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थित प्रस्थान सोहळा पार पडला.
त्यानंतर माऊलींच्या चलपादुका माऊलींच्या आजोळ घरीच आजवर मुक्कामी ठेवण्यात आल्या आहेत. यापुढे आणखी नऊ दिवस माऊलींचा मुक्काम आजोळ घरीच असणार आहे.
सोमवारी (दि. 19) सकाळी दहा वाजता माऊलींच्या पादुका विठू भेटीसाठी पंढरीकडे रंगीबेरंगी सुवासिक फुलांनी सजविलेल्या लालपरीतुन हरीनाम विठ्ठलाचा गजर करीत मोजक्याच मान्यवरांच्या आण्इ मानकऱ्यांच्या समवेत पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.
दरम्यान, माऊलींच्या जलपादुकांची दैनंदित पूजाअर्चा केली जात आहे.परंपरेनुसार शनिवारी (दि. 10) लोणंमध्ये प्रातिनिधीक स्वरुपात मुक्काम होता. तर रविवारी (दि. 11) फलटण येथे मुक्काम असून तोही इतर गावांप्रमाणे प्रातिनिधीक स्वरुपातच असणार आहे.