नीरा -गेल्या दहा दिवसांत नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वीर धरण मंगळवारी (दि. 11) 94 टक्के भरले. त्यामुळे धरणातून 800 क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मंगळवारी सकाळी वीर धरण 94.26 टक्के भरले.
तसेच सोमवारी नीरा खोऱ्यातील धरण परिसरात पाऊस झाल्यामुळे वीर धरणात 5 हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे त्यामुळे संध्याकाळी चारच्या दरम्यान धरणाच्या विद्युतगृहातून नीरा नदीत 800 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती वीर धरण विभागाचे सहायक अभियंता विजय नलवडे यांनी दिली.