संयुक्त राष्ट्र: भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना परिषदेअंतर्गत आपल्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केले आहे, असे “इंटरनॅशन्ल कोर्ट ऑफ जस्टीस’ चे अध्यक्ष न्यायाधीश अब्दुयलकवी युसुफ यांनी येथे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला सांगितले.
कुलभूषण जाधव प्रकरणी 17 जुलै रोजीच्या आपल्या निकालाबाबतचा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला सादर करताना त्यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. व्हिएन्ना परिषदेच्या अनुच्छेद 36 च्या अंतर्गत पाकिस्तानने आपल्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केले आहे आणि त्या दृष्टीने योग्य ते उपाय केलेले नाहीत, असे न्या. अब्दुयलकवी युसुफ यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने जाधव यांना फाशीच्या शिक्षेचा फेरविचार केला पाहिजे, असा “इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस’ने भारताच्या बाजूने महत्वाचा निर्णय दिला होता. दहशतवादासाठी हेरगिरीचा आरोप ठेवून जाधव यांना पकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. युसुफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा आढावा घेण्यावर आणि पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत.
युसुफ यांनी महासभेत आपला अहवाल सादर करताना जाधव प्रकरणातील कोर्टाच्या निर्णयाच्या अनेक बाबींचे तपशीलवार वर्णन केले.
व्हिएन्ना ठरावातील कलमांच मतितार्थ समजून त्यात उल्लेख असल्याप्रमाणे पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयचा निकाल नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.