नगर -नगर शहरात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी विकासवर्धिनी संस्थेतर्फे “करोना मुक्त नगर अभियान’ राबविणार असल्याची घोषणा संस्थेचे संचालक विनायक देशमुख यांनी केली.
देशमुख म्हणाले, “”करोनामुक्त नगर शहर अभियानांतर्गत प्रामुख्याने करोना प्रतिबंधक उपायांबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे व या उपायांबांबत आग्रही राहणे करोनाशी यशस्वी सामना केलेल्या व्यक्तींचे अनुभव जनतेपर्यंत पोहचविणे, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, शासकीय कर्मचारी व अन्य करोना योध्यांची यशोगाथा लोकांपर्यंत पोहचविणे, करोनाबाधित गरजु व्यक्तीला वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करणे, इत्यादी कामे केली जाणार आहेत.”
प्रत्येक कुटूंबाने काळजी घेतल्यास करोनाचा संसर्ग व त्या निमित्ताने होणारे आर्थिक व मानसिक नुकसान टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दिवसातुन दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्यावी, जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे.
रात्री झोपताना एक कप दुधात अर्धा चमचा हळद टाकुन उकळुन प्यावे, झोपताना दोन्ही नाकपुड्यांमध्ये खोबरेल तेलाचे बोट लावावे, दररोज पंधरा-पंधरा मिनीटे अनुलोम विलोम व कपालभाती हे श्वासाचे व्यायाम करावेत, गर्दी जाणे टाळावे, जाताना मास्क लावावा, वारंवार साबणाने हात धुवावेत अशा उपाय योजना केल्यास करोना पासून आपण मुक्त राहू शकतो,”असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.