मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर गेली ३० वर्षे युती असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत सत्तावाटपावरून काडीमोड झाला आहे. त्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. परंतु अजूनही भाजप शिवसेनेसोबतच्या युती बाबत आशादायी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपचा पारंपरिक मित्र असलेल्या शिवसेनेसाठी आमची दारे आजही खुलीच आहेत. आणि शिवसेना जर आमच्यासोबत येऊन सत्ता स्थापन त्याचे स्वागतच आहे. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.