मुंबई – राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. एवढेच काय तर शिंदेसह बंडखोर आमदारांनी 50 खोके घेतल्याचा आरोप देखील करण्यात आला. यावरून अनेक आरोप- प्रत्यारोप झाले. यावरून ’50 खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणा देत ठाकरे गटातील नेत्यांनी दिसतील तिथे शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली.
अशात या घोषणा आता लग्न समारंभापर्यंत देखील पोहचल्या आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे एका लग्न सोहळ्याला कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. लग्न मंडपात बांगर यांचे आगमन होताच. तेथे पहिल्यापासून उपस्थित असलेल्या ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांचे बांगर यांनी चरण स्पर्श केला. मात्र तेथे उपस्थित कार्यकर्त्यांकडून `पन्नास खोके एकदम ओके`च्या घोषणा झाल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र एकूणच घडलेल्या प्रकारानंतर खोक्याचे लोनआता लग्नसराईपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. ‘
अशात या घोषणा सुरू असतानाच ’50 खोके, एकदम ओक्के’ची नारेबाजीही सुरू झाली. आमदार बांगर यांच्यासमोरच ही नारेबाजी सुरू झाल्याने बांगर यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.