Archana Patil : 20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा निकाल; पद्मसिंह पाटील निर्दोष, अर्चना पाटलांची भावूक प्रतिक्रिया
Archana Patil : यामुळे तब्बल 20 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

Archana Patil : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी अखेर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामुळे तब्बल 20 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
या खटल्याचा मुख्य आधार असलेल्या माफीच्या साक्षीदाराची साक्ष अविश्वसनीय, विसंगत आणि संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवात निकाल दिला. यामुळे पुराव्यांतील त्रुटी आणि संशयाचा फायदा देत सर्व आरोपींची निर्देाष मुक्तता करण्यात आली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Archana Patil)
या निर्णयामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. निकालापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, न्यायालयाचा निकाल त्यांच्या अपेक्षेच्या विरुद्ध लागला आहे.
हेही वाचा : Rajashree Landge : गाढवाचं लग्न’ पार्ट 2 येणार? अभिनेत्रीने दिली मोठी हिंट म्हणाली…
दरम्यान, निकालानंतर पद्मसिंह पाटील यांच्या सून अर्चना पाटील यांनी समाधान व्यक्त करत पहिली प्रतिक्रिया दिली. “सत्याचा विजय झाला. या प्रकरणामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रचंड मानसिक, सामाजिक आणि राजकीय त्रास सहन करावा लागला. आमची अनेक वर्षे संघर्षात गेली, ती परत येणार नाहीत. पण आज न्यायालयाच्या निर्णयामुळे मनाला समाधान मिळालं आहे.” अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी निकाल लागल्यावर दिली.
हातात मंगळसूत्र घेऊन मी लोकांसमोर उभी राहत होते (Archana Patil)

Archana Patil : 20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा निकाल; पद्मसिंह पाटील निर्दोष, अर्चना पाटलांची भावूक प्रतिक्रिया
अर्चना पाटील यांनी या काळातील संघर्षाची आठवण सांगताना भावूक होत म्हटलं की, “विरोधक प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा उपस्थित करत होते. आम्ही गावोगावी फिरून लोकांना आमची बाजू समजावून सांगत होतो. हातात मंगळसूत्र घेऊन मी लोकांसमोर उभी राहत होते आणि आम्ही कोणाचाही खून केलेला नाही, हे सांगत होते.”
या निकालाने राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या राजकीय आणि कायदेशीर प्रकरणांपैकी एका प्रकरणाचा अध्याय संपला असला, तरी या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकं 20 वर्षांपूर्वी काय घडलं होतं? (Archana Patil)
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची घटना 3 जून 2006 रोजी घडली होती. ते त्यांच्या सहकाऱ्यासह कारने प्रवास करत असताना उस्मानाबाद (सध्याचे धाराशिव) जिल्ह्यातील कळंबजवळ आले असता त्यांच्यावर सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केला.
प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांची कार अडवली आणि जवळून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची ही थरारक घटना तब्बल 20 वर्षांपूर्वी घडली होती. या दोन दशकांच्या काळात या अत्यंत हायप्रोफाइल खटल्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. साक्षीदारांच्या उलटतपासण्या, विविध तांत्रिक याचिका आणि कायदेशीर विलंबाच्या चक्रव्यूहामुळे हा खटला वर्षानुवर्षे रेंगाळत गेला.
या प्रकरणात माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांवर हत्येचा कट रचल्याचा आणि अंमलबजावणी केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी आज अखेर न्यायालयाने निकाल जाहीर करत आरोपींची सुटका करण्यात आली आहे. (Archana Patil )
हेही वाचा : Pawanraje Nimbalkar Case: ओमराजे निंबाळकरांना धक्का! पवनराजे प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता





