Vande Bharat Train : जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे (Vande Bharat Train) संपर्काला मोठी चालना देणारे आणि अखंडित, बारमाही प्रवासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरणारे, जम्मू आणि श्रीनगर दरम्यानची थेट रेल्वे सेवा ३० एप्रिल रोजी सुरू होत आहे. या सेवेद्वारे एका विशेषरीत्या डिझाइन केलेल्या वंदे भारत रेल्वेचा समावेश केला जात आहे. ही रेल्वे (Vande Bharat Train) हिवाळ्यातील गोठवणाऱ्या (शून्य अंशाखालील) तापमानातही उच्च वेग कायम राखण्यास सक्षम आहे. यापूर्वी कटराच्या श्री माता वैष्णो देवी स्थानक आणि श्रीनगर दरम्यान धावत असे, ती वंदे भारत रेल्वे आता श्रीनगर ते जम्मू या संपूर्ण पट्ट्यावर धावेल. याचाच अर्थ, ३० एप्रिलपासून, वंदे भारत रेल्वे जम्मू-काश्मीरची हिवाळी राजधानी जम्मू येथून उन्हाळी राजधानी श्रीनगरकडे प्रवास करेल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते श्रीनगर आणि जम्मू दरम्यानच्या या थेट रेल्वे सेवेचे उद्घाटन होणार आहे. Vande Bharat Train ही सेवा सुरू झाल्यामुळे, प्रवाशांना श्रीनगर आणि जम्मू दरम्यान कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट प्रवास करणे शक्य होईल. हा थेट रेल्वे दुवा प्रवासाचा एक विश्वसनीय, परवडणारा आणि बारमाही पर्याय उपलब्ध करून देईल. त्यामुळे वारंवार विस्कळीत होणाऱ्या श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे काश्मीर खोऱ्यातील (Vande Bharat Train) पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल, वाणिज्य क्षेत्र अधिक बळकट होईल आणि लोका-लोकांमधील संपर्क वाढेल; तसेच शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळवणे अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे. ही सेमी-हाय-स्पीड वंदे भारत रेल्वे १६० किमी प्रति तास वेगाने धावेल आणि २६७ किलोमीटरचे अंतर अंदाजे ५ तास १५ मिनिटांत पूर्ण करेल.