तुतीकोरीन – देशात लसीकरणाचे प्रमाण वाढत असून त्यामुळेच खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेलाही चांगले औषध मिळेल, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे.
लसीकरणामुळे लोकांना त्यांच्या नियमित कामावर जाता येईल आणि त्यातून उत्पादन वाढेल, असा युक्तिवाद त्यांनी त्यासाठी केला आहे. देशात लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू असून आतापर्यंत 73 कोटी लोकांना लसीचा किमान एक तरी डोस देण्यात आला आहे.
लस घेतलेल्या लोकांना नियमित व्यापार करता येईल, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कामे करता येतील हे अंतिमत: अर्थव्यवस्थेसाठीच लाभदायी ठरणार आहे, असे त्या म्हणाल्या. तमिळनाडू मर्कंटाईल बॅंकेच्या शताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.