नवी दिल्ली – दिल्लीकडे निघालेल्या निदर्शक शेतकऱ्यांची सरकारकडून अघेारी अडवणूक केली जात आहे असे शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग उभारण्यात आल्या असून राज्याच्या सीमा “आंतरराष्ट्रीय सीमा” असल्यासारख्या कडेकेाट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.
मनोहर लाल खट्टर सरकार हरियाणातील शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.सीमेवरील रस्त्यावर तारांची कुंपणे, मोठमोठे डंपर आणून नाकेबंदी रस्त्यावर खिळे ठोकणे असे प्रकार करण्यात आले आहेत.
ते म्हणाले की, पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्ये आहेत असे वाटत नाही. असे दिसते की ते दोन देश असून त्यांच्या सीमांना आंतरराष्ट्रीय सीमा मानले गेले आहे.
शेतकऱ्यांना किमान हमी भावाची कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, शेतकरी कर्जमाफी, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना “न्याय” आणि लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना “न्याय” देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
पंढेर म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी रस्ते अडवल्याचा ठपका शेतकऱ्यांवर ठेवला असला तरी प्रत्यक्षात सरकारनेच रस्ते अडवले आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सरकारनेच रस्ते अडवले आहेत. पंजाब आणि हरियाणा सीमेवर काँक्रीटच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. आम्ही अन्नधान्य पिकवतो आणि आम्ही देशाला खाऊ घालतो आणि त्यांनी आमच्यावर नखे उगारली आहेत.
अनेक राज्यातून शेतकरी दिल्लीकडे यायला निघाले आहेत पण मध्यप्रदेशात अनेक शेतकऱ्यांची धरपकड करण्यात आलीआहे असे ते म्हणाले. हरियाणाला तर येथील भाजप सरकारने काश्मीरचे खोरेच बनवले आहे असा आरोप त्यांनी केला.