Dhananjay Munde tweet : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीत मोठा अपहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबताच निकाल दिला होता. आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य लोक आयुक्तांनी देखील या प्रकरणात निकाल दिला असून, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंजली दमानिया यांनी केलेले धनंजय मुंडे यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यानंतर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचा छळ चालूच आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी एक्सवरून काही व्हिडिओ आणि त्यांना आलेल्या मेसेजचे स्क्रिन शॅाट शेअर केले. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी शेवटी संयम सर्वात महत्वाचा! असे म्हणत एक ट्वीट एक्सवरून केले आहे. हे ट्वीट नेमके कुणाला उद्देशून केले आहे, याबाबत त्यात तसा उल्लेख करण्यात आलेला नाही. धनंजय मुंडे यांचं ट्वीट (Dhananjay Munde tweet ) “प्रत्येकाला आपल्या उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या परीने न्याय-दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जात आहोत. अश्या परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अश्या भावनिक व अविचारी कृतीमुळे आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, हे लक्षात घ्या.” शेवटी संयम सर्वात महत्त्वाचा! असे ट्वीटच्या शेवटी धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. Dhananjay Munde प्रत्येकाला आपल्या उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या परीने न्याय-दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जात आहोत. अश्या परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अश्या भावनिक व अविचारी… — Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 3, 2026 नेमकं प्रकरण काय? धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आले होते. त्यामध्ये अनियमितता करून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल देत संबंधितांचे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. लोकयुक्तांनी काय म्हटले? (Dhananjay Munde tweet) उच्च न्यायालयाने या निकालामध्ये नोंदविलेली निरीक्षणे ही स्वयंस्पष्ट, निर्णायक व शासनाच्या धोरणाला अनुसरून असल्याने तसेच याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे संबंधित याचिकेमध्ये जोडलेल्या बाबींव्यतिरिक्त, बनावट पुरावे असून कुठलाही ठोस पुरावा किंवा दखल घेण्यायोग्य काहीही नसल्याने यामध्ये आणखी वेगळी सुनावणी घेण्याचा कोणताही मुद्दा शिल्लक राहत नाही, असे लोकायुक्तांनी आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचा छळ चालूच आहे pic.twitter.com/C9RIomkKWU — Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 3, 2026 या प्रकरणात देखील संविधानातील ठराविक काही कलमे, लोकप्रतिनिधीत्व कायदा, लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास केला असून, लोक आयुक्तांच्या अखत्यारीतील कोणताही ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा किंवा त्या अनुषंगाने कुठलाही आरोप सिद्ध होत नाही. तसेच याचिकाकर्ते अंजली दमानिया यांनी याबाबत देखील कुठलाही महत्त्वाचा नवीन पुरावा त्यांच्या पुरवणी जबाबात देखील सादर केलेला नाही. त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट चा मुद्दा हा देखील निकाली काढला असून, धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. तर या निकालामुळे अंजली दमानिया यांनी झटका बसला आहे. हेही वाचा : Raw Milk For Skin: कच्च्या दुधाचा सोपा उपाय; मिळवा लोण्यासारखी मऊ आणि चमकदार त्वचा