मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. देशात कोरणामुळं विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद अडचणीत आले होते. उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोठ्यातून आता विधानपरिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली.
A decision was taken in today's cabinet meeting to recommend CM Uddhav Thackeray's name for the 2 vacant MLC posts that are recommended by Governor. As MLC elections can't be held due to #COVID19, it is being done to avoid a constitutional crisis: Maharashtra Minister Nawab Malik pic.twitter.com/kIwkhaif5p
— ANI (@ANI) April 9, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीने हा घेतला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नसल्याने घटनात्म पेच निर्माण झाला होता. संविधानाच्या कलाम १६४-४ नुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात राज्यात कोणत्याही सभागृहात निवडून येणे अनिवार्य आहे. तरच त्यांना मुख्यमंत्री पदी राहता येणार आहे.