मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray) यांच्या नेतृत्वात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाविरोधात आज मोर्चा (Dharavi morcha) काढण्यात आला. यावेळी मोर्चाला संबोधित करताना त्यांनी म्हटले की, खलबत्ता आणि अडकित्ताने तुमची दलाली ठेचून काढू की तुम्ही पुन्हा अदानींचे नाव घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
त्याबरोबरच धारावीचा #UddhavTahckeray विकास हा सरकारने करावा आणि धारावीकरांना हक्काचं घर मिळावं अशी मागणी करत धारावीकरांना, आंदोलकांना त्यांनी संबोधित केलं. हा इशारा मोर्चा आहे पण जोपर्यंत धारावीकरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही! मुंबईच काय, गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन! असा सूचक इशारा देखील त्यांनी राज्यसरकारला दिला.
गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन!#धारावीविराटमोर्चा pic.twitter.com/j2LleJf52l
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 16, 2023
उद्धव ठाकरेंच्या #UddhavTahckeray भाषणातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –
1. मुंबईच काय, गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन!
2. मुंबईकरांचा अडकित्ता, खलबत्ता माझ्याकडे आहे!
कुटून टाकू तुम्हाला!
3. भाजप म्हणजे भारतीय जुगारू पार्टी!
4. मी मुख्यमंत्री असताना एकतरी निर्णय असा सांगा, जो मी माझ्या नागरिकांच्या हिताला बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी घेतला!
5. मुंबईवर ज्या ज्या वेळी संकट आलंय, त्या त्या वेळी प्रथम धावून येतो तो शिवसैनिक!
6. धारावीचा गळा घोटणारा जीआर आम्ही कधीच काढला नाही.
7. सूटबूट की सरकार आहे!
सूट तुम्हाला आणि बूट आम्हाला असं जर केलंत…
तर बूट काय असतो हे धारावीची जनता तुम्हाला दाखवून देईल!!
8. कोरोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का?
9. विकास म्हणून धारावी अदानीच्या घशात घालताय, त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार? त्यांना 500 फूट जागेचं घर मिळालंच पाहिजे!
10. आम्ही कुठं विरोध करतोय?
आमची मागणी एवढीच की, धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे!
11. तुमच्याकडे ऑफिस असेल, पण ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत.
रस्त्यावरची ताकद काय आहे हे दाखवून देऊ! ही मुंबई आम्ही कमावलेली आहे! याद राखा आमच्या मुंबईला हात लावाल तर…!
12. जिथल्या तिथे धारावीकरांना घर मिळालं पाहिजे. पात्र-अपात्र आम्ही मानत नाही!
13. पोलीस बांधवांनो, सरकार येतं आणि जातं पण तुमचा रेकॉर्ड खराब करून घेऊ नका.
14. मुंबईला ठेचून सगळं काही गुजरातला न्यायचं हा त्यांचा डाव आहे. गुजरातला पळवलेलं दुसरं आर्थिक केंद्र, मला माझ्या धारावीत हवंय!
15. हा इशारा मोर्चा आहे! ह्या मोर्च्याचा आवाज त्यांचे चेलेचपाटे, दलाल, सुपारीबाजांच्या कानापर्यंत पोहचला तर कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही!