मुंबई – नशिब समजा तुमची स्थिती अजून महुआ मोईत्रांसारखी करण्यात आली नाही. महुआ मोईत्रांनी त्यांना ( अदाणींना ) प्रश्न विचारल्यावर निलंबित करण्यात आलं. नशिब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहात. ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम चालू होता. पण, हे ‘सरकार अदाणींच्या दारी’ आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी ( Uddhav thackeray ) सरकारवर केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाविरोधात ( Adani group ) आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाला संबोधित करताना त्यांनी म्हटले की, खलबत्ता आणि अडकित्ताने तुमची दलाली ठेचून काढू की तुम्ही पुन्हा अदानींचे नाव घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे ( tharavi morcha ) म्हणाले, धारावी प्रश्नासाठी आपण सर्व आवाज उठवत आहोत. धारावीकरांना मी वचन दिलं आहे की, तुम्ही काळजी करू नको, मी संपूर्ण मुंबईच काय अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेल. त्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले मोजके कार्यकर्ते रस्त्यावर आलो आहोत. याच वर्णन करण्याची गरज नाही आहे.
आता पन्नास खोके कमी पडायला लागले आहेत, त्यामुळे धारावी विकायला निघाले आहेत. हा लढा आता केवळ धारावीचा नाही तर महाराष्ट्राचा झाला आहे. अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करून पाडले, हे आता सर्वांना समजले असेल. त्यांना खोके कुणी पुरवले, त्यांची हॉटेल बुकिंग कुणी केली, हेही सर्वांना सजमली असेल. जोपर्यंत मी होतो तोपर्यंत त्यांना काहीच करता आले नाही. त्यामुळे सरकार पाडले, असा आरोपही त्यांनी केला.
तसेच धारावीतील संडास, बाथरूम सगळ्यांचा ‘टीडीआर’ अदाणींना देऊन टाकला आहे. फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा ‘टीडीआर’ देण्यात आला नाही. कारण, बिनसवलतीच्या ढगांचा पाऊस एवढा पाडला आहे की, आणखी ढगांची गरज नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
अदाणींना सर्वच आंदण – वर्षा गायकवाड
अदाणींना सर्वच आंदण देण्याचा सपाटा लावला गेला आहे. अदाणींनी विमानतळ घेतले, पोर्ट घेतले, बँका घेतल्या. आता धारावी घेणार का? अदाणींनी मुंबईसाठी काय केले? पण धारावी तुमच्या हाती लागणार नाही. मोदाणींना धारावीचे लचके तोडू देणार नाही. धारावी एकट्याने लढणारी आहे. धारावीसाठी सर्व पक्ष एकत्र येऊन लढतील”, अशी भूमिका आमदार वर्षा गायकवाड यांनी मांडली. वर्षा गायकवाड म्हणाल्या, काही लोकांना (भाजपा) वाटतं आपल्या मित्राला (अदाणी) मदत केली पाहीजे. म्हणून रोज नवीन नवीन गोष्टी आणल्या जात आहेत. धारावीचे धारावीपण टिकले पाहीजे. धारावी बीकेसीचे विस्तारीकरण होता कामा नये. धारावीकरांना धारावीतच घर मिळाले पाहीजे.