Tushar Gandhi on RSS । केरळमधील नेयट्टींकारा याठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजप कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या विरोधात निदर्शने केली. तुषार गांधी टीबी जंक्शन याठिकीणी त्यांच्या निवासस्थानी गांधीवादी नेते गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचे अनावरण करत असताना हा निषेध करण्यात आला. यावेळी तुषार गांधी यांनी भाषण दिले. त्यात त्यांनी, “देशाचा आत्मा कर्करोगाने ग्रस्त असून संघ परिवार तो पसरवत आहे.” त्यांच्या विधानानंतर भाजप आणि आरएसएस कार्यकर्ते दुखावले आणि त्यांनी निषेध केला. कोणत्या विधानाला विरोध होता? Tushar Gandhi on RSS । तुषार गांधी यांच्या विधानाबाबत, आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांचे विधान मागे घेण्यास सांगितले आणि माफी मागण्यासही सांगितले. मात्र, त्यांच्या विधानाला विरोध असूनही, तुषार त्यांच्या टिप्पणीवर ठाम राहिले आणि निघण्यापूर्वी “गांधी की जय” चा नाराही दिला. जेव्हा संघ आणि भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि तुषार गांधींची गाडीही रोखली तेव्हा परिस्थिती आणखी चिघळली. या घोषणांना उत्तर म्हणून, तुषार गांधी यांनी घटनास्थळ सोडण्यापूर्वी “आरएसएस मुर्दाबाद” आणि “गांधी झिंदाबाद” असे नारे दिले. विरोधकांनी निषेध केला Tushar Gandhi on RSS । केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने (केपीसीसी) आरएसएस-भाजप कार्यकर्त्यांच्या निषेधाचा तीव्र निषेध केला. केपीसीसी अध्यक्ष के सुधाकरन यांनी याला केरळच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांचा अपमान म्हटले आणि भाजप-आरएसएसवर “गोडसेच्या भूताने” पछाडलेले असल्याचा आरोप केला. सुधाकरन म्हणाले, “गांधींना बदनाम करणाऱ्या आणि गोडसेची स्तुती करणाऱ्या सांप्रदायिक शक्तींना केरळमध्ये स्थान नाही. संघ परिवार हा राष्ट्राच्या आत्म्याला लागलेला कर्करोग आहे आणि धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोका आहे असे म्हणणे चुकीचे काय आहे? त्यांनी सत्ताधारी सीपीएमच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भाजपला फॅसिस्ट शक्ती मानते का यावर स्पष्टता मागितली. ते म्हणाले, “केरळचा धर्मनिरपेक्ष विवेक या कृत्याला माफ करणार नाही.” या घटनेचा व्यापक निषेध झाला. विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन म्हणाले की, तुषार गांधी यांची गाडी थांबवणे हे महात्मा गांधींचा अपमान करण्यासारखे आहे. त्यांनी म्हटले की, ही घटना संपूर्ण राज्यासाठी लाजिरवाणी आहे. सीपीआयचे राज्य सचिव बिनॉय विश्वम यांनी या घटनेला अक्षम्य गुन्हा म्हटले आहे. ते म्हणाले की, या घटनेने पुन्हा एकदा संघ परिवार उघडा पडला आहे.