उरुळी कांचन: भीषण अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रफिक जाम..! पाच किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

Pune Solapur accident news: पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचनजवळ तळवडी चौकात कंटेनर व एका ट्रकचा भीषण भीषण अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी ही अपघाताची घटना घडली असून, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाले नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण अपघाताच्या घटनेनंतर अत्यंत गजबजलेल्या तळवडी चौकात वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांगच लांब रांगा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटनेर हा तळवडी चौकातून शिंदवणे रस्त्याकडे वळत असताना सोलापूरच्या बाजूने आलेल्या ट्रकने कंटनेरला जोरदार धडक दिली. यावेळी दोन्ही वाहने रस्त्यावर पडली. या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघाताच्या घटनेची माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तुफान पाऊस अन् कोंडी
आधीच शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागत असताना आता या महामार्गावर अपघाताची घटना घडल्याने वाहन चालकांनमा मोठ्या मनस्तापाचा सामाना करावा लागत आहे.





