Maharashtra Politics : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Maharashtra Politics) माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. (Maharashtra Politics) जेथलिया यांचा राजकीय कार्यकाळ सुरेशकुमार जेथलिया यांनी २००९ साली परतूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्याआधी २००४ मध्ये त्यांची शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुढे २०२५ मध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (Maharashtra Politics) २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले होते. (Maharashtra Politics) परतूर शहर आणि परिसरात त्यांचा मोठा प्रभाव होता. तब्बल २५ वर्षे परतूर नगरपालिकेवर त्यांचे वर्चस्व राहिले होते. त्यांच्या निधनामुळे परतूर-मंठा परिसरात शोककळा पसरली असून अनेक राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. (Maharashtra Politics) परतूरच्या राजकारणात मोठी पोकळी जेथलिया हे केवळ राजकीय नेते नसून परतूर परिसरातील सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे नेते होते. २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला, तरी स्थानिक राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असे. त्यांच्या निधनामुळे अजित पवार गटाला मराठवाड्यात, विशेषतः जालना जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. (Maharashtra Politics)