…त्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी रवाना दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करुन नका, असा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीला निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतरही मुंबईत अद्याप महायुतीचा महापौर विराजमान होऊ शकलेला नाही. या सर्व घडामोडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी निघून गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारपर्यंत मुंबईत होते. त्यानंतर ते साताऱ्याकडे रवाना झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते साताऱ्याला गेल्याचे सांगितले जात असले तरी शिवसेना-भाजप यांच्यात पालिका निवडुकीनंतर सर्वकाही आलबेल नसल्याचीही कुजबुज रंगली आहे. मला कोणत्याही विवादात पडायचं नाही महाराष्ट्राचे राज्यपाल असताना भगत सिंह कोश्यारी यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करत अनेक विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली. “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते”, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली होती. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलीय. याविषयी बोलताना, “काही छोट्या मनाचे लोक एकप्रकारे विवाद निर्माण करत आहेत. मला कोणत्याही विवादात पडायचं नाही. पण काही लोकांच्या काळात काय काय घडलंय, कोणाला पद्मश्री मिळालाय हे सांगितलं तर ते आजच्या दिवसाचं औचित्य राहणार नाही. म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही.” असं म्हणत विरोधकांना उत्तर दिलंय. ‘गणेश नाईकांनी स्वतःला आवर घालावा’ Top 10 news : भाजपाने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण संपवून टाकू’, असं म्हणत गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांच्या याच वक्तव्याचा शिंदे गटाकडून समाचार घेण्यात आलाय. शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनी गणेश नाईकांना इशारा देत मी आज नंदुरबार जिल्ह्यात आहे,एक महानगरपालिका म्हणजे काय संपूर्ण राज्य होत नाही. त्यामुळे मला वाटतं गणेश नाईक यांनी स्वत:वर आवर घातला पाहिजे. आमच्या नेत्यावर जर अशा प्रकारे कोणी बोलत असेल तर आम्ही देखील शिवसैनिक आहोत आणि ते देखील मुळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे शिवसैनिक काय करू शकतो हे गणेश नाईकांना चांगलंच माहिती आहे”,असं म्हटलंय. “शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही” आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत रहाणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. धारातीर्थी यात्रा ही सध्या रायगड जिल्ह्याच्या कर्जतमधील लोहगड, भीमगड, अशा गडकिल्ले मोहिमसाठी सुरू आहे. यावेळी, यात्रेदरम्यान त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, ते जातिवंत आहेत. अशा शब्दात संभाजी भिंडेंनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे, भिडेंच्या या वादग्रस्त विधानाने वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी संचार घेत शरद पवारांवर अशा शब्दात टीका करणे योग्य नसल्याचं म्हटलंय. ऐन हिवाळ्यात राज्याला पावसाने झोडपले महाराष्ट्रात पुन्हा एकदा निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळतोय. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुणे, मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. दरम्यान,बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झालाय. या बदलामुळे किमान तापमानात वाढ झाली असून हुडहुडी भरवणारा गारठा सध्या ओसरलाय. पुढील २४ तास असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामानविभागानं वर्तवलीय. विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना मुंबईच्या भाविकांवर काळाचा घाला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला झालाय. सोलापुरातील पंढरपूरच्या मंगळवेढाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाविकांची कार मंगळवेढा मार्गे पुढील प्रवासासाठी जात होती. मंगळवेढाजवळ ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकने कट मारल्याने भाविकांची गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. त्यामुळं या भीषण अपघातात तीन महिला आणि एक १४ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाल्याचं म्हटलंय. तर अन्य पाच ते सहा भाविक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या जखमींना मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनासाठी ग्रुप फोटो काढताना पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात एका उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय.उमरगा तहसीलमधील तलमोड सीमा चौकीवर ध्वजारोहण समारंभ सुरू होता. समारंभानंतर, ५६ वर्षीय मोहन जाधव कर्मचाऱ्यांसोबत ग्रुप फोटोसाठी उभे असताना अचानक अस्वस्थ वाटले आणि ते कोसळले.त्यानंतर तात्काळ मोहन जाधव यांना उमरगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झालीय. आज देशातील बँका बंद आज देशातील बँका बंद असणार आहे. आज बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप करणार आहे. बँक कर्मचारी युनियनचा संप असणार आहे. त्यामुळे बँकेचे अनेक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहे. दरम्यान बँक युनियनची मागणी आहे की, बँकेच्या कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा कामाचा आठवडा करावा. म्हणजेच शनिवार-रविवारी सुट्टी मिळावी. सध्या बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी आहे. त्यामळे ही मागणी केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडे हा प्रस्ताव देण्यात आलाय. मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नसल्यानं हा संप पुकारण्यात आल्याचं म्हटलं जातंय. भारत-युरोपियन युनियनमधील व्यापार करारात अनेक वस्तू स्वस्त होणार ? भारत आणि युरोपियन युनियनमधील व्यापार करारावरील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत आणि आज स्वाक्षरीसह कराराची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. १८ वर्षांच्या वाटाघाटींनंतर हा करार अंतिम झाला असला तरी, तो अंमलात आणण्यास वेळ लागेल, कारण या कराराला युरोपियन संसद आणि भारत सरकारची मान्यता आवश्यक आहे. पण जर भारताने युरोपियन युनियनशी करार केला तर भारतातील अनेक गोष्टी स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामध्ये बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कार , मद्य , हिरे या वस्तूसह अन्य काही वस्तू देखील स्वस्त होणार असल्याचं म्हटलं जातंय युरोप अमेरिकेशिवाय स्वतःचे रक्षण करू शकत नाही Top 10 news : नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी युरोप अमेरिकेशिवाय स्वतःचे रक्षण करू शकत नाही, असे म्हटले आहे. त्यांनी युरोपीय नेत्यांना इशारा देत जो कोणी असे मानतो की युरोप किंवा युरोपीय संघ स्वतःची सुरक्षा एकट्याने हाताळू शकतो तो “स्वप्नांच्या जगात” जगत आहे, असं म्हटलं. युरोप आणि अमेरिकेला एकमेकांची गरज आहे.असंही त्यांनी म्हटलंय.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडला आपल्यात समाविष्ट करण्याचे आवाहन केल्यानं नाटो आणि अमेरिकेत तणाव वाढलाय. ट्रम्प यांनी ग्रीनलँडला पाठिंबा देणाऱ्या युरोपीय देशांवर नवीन शुल्क लादण्याची धमकीही दिली होती, मात्र काही काळानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. या वाटाघाटींमध्ये रुट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं म्हटलं जातंय.