महापालिकेकडून मतमोजणी केंद्रांची यादी जाहीर महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदार होणार असून त्यानंतर लगेच १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी केंद्राची अखेर महापालिकेने घोषणा केली आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले असून संबंधित प्रभागांतील क्रीडा संकुले, शाळा, महाविद्यालये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. मतदानानंतर सर्व मतपेट्या मतमोजणीच्या ठिकाणी उभारलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेचे उपायुक्त अरविंद माळी यांनी ही माहिती दिली. मतमोजणी केंद्रांमध्ये बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय,सिंहगड रस्ता ,कसबा–विश्रामबागवाडायासह शहरातील १२ क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश असल्याचंही माळी यांनी यावेळी म्हटलं. महायुती शासनाकडून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लूट राज्यातील महायुती सरकारकडून चुकीच्या पद्धतीने योजना राबवून भ्रष्टाचार करीत मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे, अशी टीका कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात दोघांनीही विविध विषयांवर भाष्य केले.लाडकी बहीण योजना चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे अनेक गैरप्रकार घडल्याचेही त्यांनी नमूद केले.पुणे फर्स्ट हेच प्रमुख ध्येय राहणार आहे. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर युती सरकार अपयशी ठरले आहे. भाजप जाहीरनाम्यात केवळ घोषणाच करत असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी प्राधान्य देणार महापालिकेच्या माध्यमातून केवळ प्राथमिक, माध्यमिक नव्हे, तर अभियांत्रिकीसह उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्र. १२ मधील उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी दिली. प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या शैक्षणिक व्हिजनचा रोडमॅप मांडला.पुणे शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांच्या निवासाचा आणि भोजनाचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या निधीतून स्वतंत्र ‘वसतिगृह संकुल’ उभारण्यावर आपला भर असेल.शाळांचे आधुनिकीकरण, मोफत शालेय साहित्य आणि शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केले. पुणेकरांसाठी काँग्रेसचा ’अधिकारनामा’ प्रसिद्ध! महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आघाडीने पुणेकरांचा अधिकारनामा असलेला पुणे फर्स्ट हा जाहीरनामा प्रकाशित केला. आरोग्यदायी, आनंददायी, सुरक्षित जागतिक दर्जाचे राहणीमान पुणेकरांना देण्यासाठी आवश्यक ते विकास प्रकल्प उभारण्याचा निर्धार जाहीरनाम्यात केलाय. त्यात वाहतुक कोंडी सोडविण्याला प्राधान्य देण्यात आलंय.कॉंग्रेस भवन याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री व पुण्याचे प्रभारी सतेज पाटील यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीसाठी पुणेकराचा अधिकारनामा प्रकाशित करण्यात आला. एका भ्रष्टाचारी माणसाच्या हातात सगळा कारभार पिंपरी चिंचवड शहरात इतर तीन आमदार आहेत. शंकर जगताप तुलनेने लहान असल्याने बोलत नाही. विधान परिषदेच्या दोन आमदारांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे शहरामध्ये एका भ्रष्टाचारी माणसाच्या हातात सगळा कारभार गेला आहे. त्यामुळे तुम्हीही खा आणि मी ही खातो असं म्हणत शहराचं वाटोळं केल्याचा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तसंच “जे आज माझ्यावर टीका करत आहेत, तो किती पात्रतेचा आहे, हे पाहूनच टीका मनावर किती घ्यायची हे ठरवले पाहिजे. काही जण सुपारीबाज आहेत, त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही” असंही त्यांनी म्हटलंय. महापालिकेसाठी भाजप-राष्ट्रवादीची नूरा कुश्ती” पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप-राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले आराेप-प्रत्याराेप सुरू आहेत. महापालिका निवडणुकीसाठी हे सुरू असून ही फक्त नुराकुस्ती आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हे आराेप सुरू आहेत. भाजपचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भ्रष्टाचाराचे आका म्हणतात, मात्र या आकांना त्यांच्याच नेत्यांनी मांडीवर घेतल्याची टीका उध्दवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलीय. भाजपकडून तब्बल 26 बंडखोरांचे सहा वर्षांसाठी निलंबन राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षातील अंतर्गत विरोध आणि पक्षातील बंडखोरी हि उच्च पदस्थ नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशातच या बंडखोरांवर मुंबई भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजपने बंडखोरी करणाऱ्यांचं थेट निलंबन करत कारवाईचा बडगा उगारलाय. मुंबई महापालिकेत अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केलेल्यांचे पक्षश्रेष्ठींकडून निलंबन करण्यात आलंय. मुंबई भाजपकडून जवळ जवळ 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हि निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. “पक्षाकडून विचारणाच होत नसेल तर घरी बसलेलं बरं” महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री भेट घेतल्याने खळबळ उडालीय. महापालिका निवडणुकीत मुलीला उमेदवारी मिळाली नसल्यानं दगडू सकपाळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. “जोपर्यंत गरज होती तोपर्यंत पक्षासाठी काम केलं. आता गरज संपली, पक्षाकडून विचारणाही होतं नाही. एक फोन जरी आला असता तरी समाधान होतं, मात्र पक्षाकडून विचारणाच होत नसेल तर घरी बसलेलं बरं.असं म्हणत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवलीय. कर्नाटक सरकारने नॅशनल हेराल्डला कोट्यवधीच्या जाहिराती कर्नाटक सरकारने इतर कोणत्याही राष्ट्रीय दैनिकापेक्षा काँग्रेस पक्षाच्या वृत्तपत्र नॅशनल हेराल्डला जास्त जाहिराती दिल्याची माहिती समोर आलीय. केंद्र सरकारने या संबंधी आकडेवारी प्रसिद्ध केलीय त्यानंतर, विरोधी पक्ष भाजपने काँग्रेस पक्षावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला. सरकारी नोंदींनुसार, राज्य सरकारच्या जाहिरात बजेटमधून नॅशनल हेराल्डला कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या सलग दोन वर्षांत, कर्नाटकातील राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये सरकारने नॅशनल हेराल्डला सर्वाधिक जाहिरात खर्च केलाय. इराणमध्ये इस्लामिक राजवटीविरुद्ध निदर्शने सुरू इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून महागाई आणि घसरत्या चलनाच्या निषेधार्थ निदर्शने सुरू आहेत. गुरुवारी रात्री इराणचे निर्वासित युवराज रझा पहलवी यांनी लोकांना घराबाहेर पडून इस्लामिक राजवटीविरुद्ध निषेध करण्याचं आवाहन केलं तेव्हा निदर्शनं आणखी तीव्र झाली. रझा पहलवी यांच्या आवाहनानंतर, मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले. दरम्यान, इराणी सरकारने रस्ते मोकळे करण्यासाठी सुरक्षा दल तैनात केले. इराणमधील किमान ५० शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं होत असल्याचंसांगण्यात येतंय. लोक रस्त्यावर उतरून इराणी राजवटीविरुद्ध घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, अनेक शहरातील इंटरनेट सुविधा देखील बंद करण्यात आल्या आहेत.