Supreme Court CJI Surya Kant। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयीन सुधारणा सुचवणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत याचिकाकर्त्याला चांगेलच फटकारले. याचिकाकर्त्याने हिंदीमध्ये आपला मुद्दा मांडला. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनीही हिंदीमध्ये त्यांना समजावून सांगितले की जर तुम्हाला देशाच्या न्यायव्यवस्थेत बदल हवा असेल तर तुम्हाला अशी जनहित याचिका दाखल करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एक पत्र लिहून मला पाठवावे” याचिका दाखल करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा Supreme Court CJI Surya Kant। यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी,”तुम्ही प्रत्येक प्रकरण वेळेच्या मर्यादेत सोडवण्याबद्दल बोलत आहात, परंतु तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे की तपास यंत्रणेचीही यात भूमिका आहे.” असे ते म्हणले. त्यासोबतच पोलिस आणि न्यायालयाचे काम वेगळे आहे. तुम्ही दररोज एसएचओला फोन करून तपासाबद्दल विचारू शकत नाही. तुम्ही म्हणत आहात की प्रत्येक न्यायालयाने एका वर्षाच्या आत निकाल द्यावा. यासाठी किती न्यायालये लागतील याची तुम्हाला कल्पना आहे का? जर याचिका प्रसिद्धीसाठी दाखल केली असेल तर लॉनवर कॅमेरामनसाठी याचिका दाखल करू नका.” असे त्यांनी यावेळी म्हटले. याचिकांमध्ये या सर्व मागण्या केल्या Supreme Court CJI Surya Kant। सर्वोच्च न्यायालयात, सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, आजकाल लोक प्रसिद्धीसाठी याचिका दाखल करत आहेत. एका याचिकेत न्यायालयीन सुधारणांसाठी समितीची मागणी करण्यात आली होती. १२ महिन्यांत प्रकरणे निकाली काढावीत अशी मागणी करणारी एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे. अशा मागण्यांसाठी याचिका दाखल करू नयेत; उलट, अशा सूचना थेट पत्राद्वारे पाठवता येतील. केवळ न्यायालयीन सुधारणांसाठी न्यायालयात येऊ नका. न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका आणि तुमचा वेळही वाया घालवणार नाही.” असा सल्ला देखील दिला.