नागपूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एमएसआरटीसी) २०२६ पर्यंत ८,००० नवीन बसेस खरेदी करणार आहे, त्यापैकी ३,००० बसेससाठी निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असल्याची माहीती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. बस संघटनेला पूरवणी मागण्यांद्वारे २,८९३ कोटी रुपये देखील मिळतील. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तरतूद केलेली रक्कम आणि त्यांच्या प्रलंबित थकबाकीचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री सरनाईक हे भाई जगताप, सतेज पाटील, अनिल परब, सुनील शिंदे आणि इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, एमएसआरटीसी नविन बसेस खरेदी करणार आहे त्यापैकी ३,००० बसेसची निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. टाटा आणि अशोक लेलँडला या कामाची ऑर्डर देखील देण्यात आली आहे. उर्वरित ५,००० बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. या सर्व ८,००० बसेस २०२६ मध्ये सेवेत समाविष्ट होतील. तसेच, कंत्राटी पद्धतीने आणखी २,५०० चालकांची भरती केली जाईल, अशी माहीतीही सरनाईक दिली. एमएसआरटीसी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या सात तारखेपूर्वी पगार मिळेल याची खात्री करत आहे. तसेच, २०४७ पर्यंत परीवहन इलेक्ट्रिक वाहने स्वीकारून, पूर्णपणे डिझेलमुक्त बसेस व्हाव्यात यासाठी सरकार काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.