“अनेकांना निवडणुकीतच कंठ फुटतो!” पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रचारात भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांना चॅलेंज दिलं होतं. आता, या दोघांच्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. तसेच, शेरो शायरीच्या माध्यमातून अजित पवारांवर टीका करत महेश लांडगेंना सल्ला दिला. देवेंद्र फडणवीस यांनी आमचे महेश लांडगे जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो. अनेकजण आरोप करत आहेत. मात्र मी सांगू इच्छितो की, ”परिंदे को मिलेगी मंजिल एकदिन, ये उनके फैले हुये पंख बोलते है! और वही लोग जो खामोश रहते है, अक्सर जमाने मे जिनके हुनर बोलते है !! असे म्हणत फडणवीसांनी शायरीतून टोला लगावला. तसंच महेश दादा तुम्ही टीका करु नका, फक्त आपण केलेल्या कामांची आठवण करुन द्या. म्हणजे,टीका करण्याची गरज पडणार नाही, असा सल्लाच फडणवीसांनी महेश लांडगेंना दिला. पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी, तसेच नागरिकांना पेट्रोलवर जादा पैसे खर्च करावे लागू नयेत, यासाठी मेट्रोचा आणि बसचा प्रवास मोफत देणार असल्याचे आश्वासन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनाम्याद्वारे पुणेकरांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आधीच तोट्यात असलेली पीएमपीएमएल आणि महापालिकेच्या आर्थिक गणिताची सोडवणूक करून हा मोफत प्रवास कसा देणार, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मात्र पवार या वेळी देऊ शकले नाहीत.आम्ही निवडणूक लागण्याआधीच तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले. “फाइल अडविणारे मोफत वाहतूक सेवा देणार कशी?” महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू असतानाच; शनिवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या संयुक्त जाहीरनाम्यातील घोषणेवरून भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत म्हणून मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाची फाइल सहा महिने अडवून ठेवणारे अजित पवार पुणेकरांना मोफत पीएमपी, मेट्रो कशी देणार? मोफत प्रवासाचा निर्णय घ्यायचा असेल, तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणावा लागेल, तसेच त्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच असे असेल, पाटील यांनी सुनावले आहे. निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांवर धाक उरला नाही” विधानसभा निवडणुकीवेळी मतदार यादीत घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले होते. दुबार मतदारांचे एकाच ठिकाणी मतदान होईल, असे जाहीर केले तरी तसे झाले नाही. महापालिका निवडणुकांमध्येही मतदार यादीतील घोळ कायम असून आयोगाचा सत्ताधाऱ्यांवर धाक राहिलेला नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय.अजित पवार हे रोज भाजपवर टीका करत असले तरी सत्तेसाठी भाजपला गोचीडासारखे चिकटून असल्याचा टोला देखील लगावला. “बापाची चप्पल पायात आली म्हणजे स्वतःला शहाणं समजू नये” पिंपरी चिंडवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आहेत. प्रचाराच्या दरम्यान अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर टीका केली. दरम्यान, महेश लांडगे यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं. त्यानंतर सूरज चव्हाण यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. सोशल मीडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी, “महेश लांडगे हा सुरुवातीला अजितदादांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवत असतो. अजितदादा ज्यावेळी डाव टाकतील त्यावेळी लांडगेचं चित होणं ठरलेलं आहे. लांडगे सारखा लुटारू पैलवान पुन्हा राजकीय मैदानात दिसणार नाही याचीही काळजी घेतील. बापाची चप्पल पायात आली म्हणजे लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये.” प्रचारासाठी बाहेर येणाऱ्या भाई, दादांना कोर्टाचा धक्का महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हे असलेले भाई, अण्णा, दादा बाहेर येण्याची धडपड करत असले तरी कोर्ट आणि प्रशासनाने ठाम भूमिका घेतलीय. प्रचारासाठी प्रवेशबंदी उठविणे, पॅरोल किंवा जामीनसाठी वकिलांमार्फत अर्जांचा सपाटा लावला असला तरी निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि लोकशाही मुल्यांनुसार व्हाव्यात, यावर कोर्ट, पोली ठाम असल्याने आरोपींचे अर्ज नामंजूर होतायेत.त्यामुळे गंभीर गुन्हे असलेले कोणतेही गुन्हेगार बाहेर येणार नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. लंडनहून मुंबईत येताच डॉ. संग्राम पाटील पोलिसांच्या ताब्यात लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी विमानतळावरूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळं एकच खळबळ उडालीय. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर ॲड.असीम सरोदे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय. संग्राम पाटील यांनी सोशल मीडियावर मोदी सरकारच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लिखाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी संग्राम पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याचं संग्राम पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात आपण कायदेशीर मार्गाने पुढे जाणार असल्याचं संग्राम पाटील यांनी सांगितलंय. राज्यात तापमानाचा पारा घसरला राज्यात कडाक्याची थंडी दिवसेंदिवस वाढत असून, किमान तापमानातात घट झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात ‘थंडीच्या लाटेसारखी’ परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली असून,आज गारठा कायम राहणार असल्याचं सांगितलय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, किमान तापमान १० अंशांखाली गेल्यास आणि सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र थंडीची लाट मानली जाते. त्यानुसार, निफाड, धुळे, परभणी येथे थंडीच्या लाटेसदृश स्थिती होती, तर उर्वरित राज्यात थंडीचा कडाका लक्षणीय वाढला आहे. “हिंदू समजाने एकत्र आलं पाहिजे ही आपली गरज” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू एकतेबाबत सनातनींसाठी मोठा संदेश दिला आहे. सगळ्या हिंदूंनी जातीभेद, मतभेद विसरुन एक झालं पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा भेदाभेद नको असं महत्त्वाचं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. मथुरामधील सनातन संस्कृती महोत्सव आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. जगात जेवढे हिंदू आहेत, त्यांनी हिंदू समाजातील व्यक्तींशी मैत्री केली पाहिजे, सौहार्द बाळगला पाहिजे. एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी होणं या गोष्टी हिंदू समाजातील सगळ्याच व्यक्तींनी केल्या पाहिजेत. हिंदू समजाने एकत्र आलं पाहिजे ही आपली गरज आहे, असंही मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात म्हटलं आहे. अमेरिकेचा सीरियामध्ये आयसिसवर मोठा हल्ला यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने सीरियामध्ये आयसिसच्या अनेक ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केलेत. ही कारवाई ऑपरेशन हॉकआय स्ट्राइकचा एक भाग म्हणून करण्यात आली, ज्याचा उद्देश या प्रदेशात कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कचा पूर्णपणे नाश करणे हा आहे. सेंटकॉमने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली, ज्यामध्ये ही कारवाई दहशतवादाशी लढण्याच्या अमेरिकेच्या सततच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. या कारवाईचा उद्देश अमेरिकन सैन्य आणि सहयोगी दलांवर दहशतवादी हल्ले रोखणे, भविष्यातील धोके दूर करणे आणि प्रदेशातील सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. “जो कोणी आमच्या सैन्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, ते कुठेही असले तरी, त्यांना शोधून त्यांचा नॅश केला जाईल असं म्हटलंय. “