Khawaja Asif on India: पाकिस्तान आणि तालिबानमध्ये रात्रभर भयंकर युद्ध सुरू आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणी बॉम्बहल्ला केला. तालिबानच्या प्रवक्त्याने याविषयी बोलताना, भ्याड पाकिस्तानी सैन्याने काबूल, कंधार आणि पक्तिया यासह अनेक ठिकाणी बॉम्बहल्ला केला. देवाचे आभार, कोणालाही दुखापत झाली नाही.” असे म्हटले. दरम्यान, पाकिस्तानने या सर्व गोष्टींसाठी अफगाणिस्तानला जबाबदार धरले आहे आणि भारतालाही यात ओढले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी,”अफगाणिस्तानातून नाटो सैन्याच्या माघारीनंतर शांतता परत येईल आणि तालिबान अफगाणिस्तानच्या लोकांच्या हितावर आणि प्रदेशाच्या स्थिरतेवर लक्ष केंद्रित करेल अशी आशा होती.”असे म्हटले. मात्र , तालिबानने अफगाणिस्तानला भारतीय वसाहत बनवले. त्यांनी जगभरातून दहशतवादी अफगाणिस्तानात एकत्र केले आणि दहशतवाद निर्यात करण्यास सुरुवात केली. तालिबान भारताचा प्रॉक्सी बनला – ख्वाजा आसिफ Khawaja Asif on India: ख्वाजा आसिफचा आरोप आहे की अफगाण सरकारने स्वतःच्या लोकांना मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवले आहे. त्यांनी महिलांना इस्लामने हमी दिलेल्या अधिकारांपासून वंचित ठेवले आहे. Khawaja Asif on India: पाकिस्तानने परिस्थिती स्थिर करण्यासाठी थेट आणि मित्र देशांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी पुढे सांगितले की आम्ही खूप राजनैतिक प्रयत्न केले, परंतु तालिबान भारताचे प्रतिनिधी बनले. ‘आता आमचा संयम संपलय’ Khawaja Asif on India: त्यांनी पुढे म्हटले की,आज जेव्हा अल्लाहच्या कृपेने पाकिस्तानला लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, तेव्हा आमचे सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. पूर्वी पाकिस्तानची भूमिका सकारात्मक राहिली आहे. त्यांनी ५० वर्षांपासून ५० लाख अफगाणिस्तानला आश्रय दिला. आजही लाखो अफगाणिस्तान आपल्या भूमीवर आपली उपजीविका करत आहेत. आता आमच्या संयमाची मर्यादा ओलांडली आहे आणि हा उघड संघर्ष आहे. ख्वाजा आसिफ म्हणाले की,आता कठोर कारवाई होईल. पाकिस्तानचे सैन्य समुद्रापलीकडून आलेले नाही. आम्ही तुमचे शेजारी आहोत आणि तुमचे खरे स्वरूप आम्हाला चांगले माहित आहे.