दुबई : बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे भारतीयांच्या मनात बांगलादेशबाबत रोष आहे. त्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंनाही भारतात एंट्री देऊ नये, अशी भावना नागरिकांच्या मनात होती. भारतीयांचा राग पाहून त्यांना बांगलादेशच्या खेळाडूना आयपीएलमध्ये न खेळवण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा मिस्ताफिझूर रेहमान हा केकेआरमधून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बांगलादेशने आयपीएलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर आपले वर्ल्ड कपमधील कोलकाता येथील सामने दुसरीकडे खेळवण्याची मागणी केली, जेणेकरून भारताला धक्का देता येईल. पण आयसीसीच्या नियमामुळे त्यांचाच हा गेम त्यांच्याच अंगलट योणार असल्याचे समोर आले आहे.बांगलादेशने आयसीसीला सांगितले आहे की, कोलकातामधील सामने तिथे खेळवू नयेत. पण जर आयसीसीने त्यांना नकार दिला तर काय, ही सर्वात मोठी गोम आहे. कारण त्यानंतर बांगलादेशने ही गोष्ट मान्य केली नाही तर काय होऊ शकते, यासाठी आयसीसीचा एक नियम सर्वात महत्वाचा ठरतो. जर एखादा देश ठराविक ठिकाणी खेळण्यास तयार नसेल आणि त्यासाठी सबळ कारण देत नसेल, तर आयसीसी त्यांना वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, असा प्रश्न विचारू शकते. बांगलादेशने त्यानंतर होकार दिला तर त्यांना भारतात येऊन खेळावे लागेल, जी त्यांची हार असेल. पण जर बांगलादेशने खेळण्यास तयार नसल्याचे म्हटले तर आयसीसी त्यांना वर्ल्ड कपच्या बाहेरही करू शकतो. त्यामुळे आता आपल्याच जाळ्यात बांगलादेश फसलेला आहे. भारताची कोंडी करण्यासाठी बांगलादेश पुढे सरसावला होता. पण आता त्यांचा मोठा गेम झाला आहे. कारण भारताशी पंगा घेणे हे बांगलादेशला कसे महागात पडू शकते, हे आयसीसीच्या नियमानुसार आता समोर आले आहे.