G Ram G bill। लोकसभेत आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी “भारताचा विकास – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण)” हे विधेयक सादर केले तेव्हा मोठा गोंधळ उडाला. विरोधी पक्ष ज्याला “जी राम जी विधेयक” म्हणत आहेत, ते विधेयक सादर होताच काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र निषेध केला आणि कामकाजात व्यत्यय आणला. सरकारचा असा दावा आहे की हे विधेयक ग्रामीण रोजगार आणि उपजीविकेचे साधन मजबूत करण्यासाठी आहे, तर विरोधी पक्ष याला विद्यमान योजनांचे नाव बदलण्याचा प्रयत्न म्हणत आहेत. प्रियंका गांधींचा आक्षेप ; स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी G Ram G bill। काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी नियम ७२(१) अंतर्गत तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी सांगितले की मनरेगा गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरली आहे. त्यांनी मागणी केली की हे विधेयक थेट मंजूर करण्याऐवजी संसदीय स्थायी समितीकडे पाठवले जावे. “मनरेगा कामगारांच्या स्थितीशी संबंधित एक प्रश्न” प्रियंका गांधी म्हणाल्या,”ग्रामीण भागात मनरेगा कामगार दुरूनच सहज ओळखता येतात – त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि दगडासारखे कडक हात असतात,मग या योजनेत कोणताही बदल करण्यासाठी गंभीर चर्चा आवश्यक आहे”. प्रियंका गांधी यांनी स्पष्टपणे विधेयक मागे घेण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “प्रत्येक योजनेचे नाव बदलण्याचे “वेड” समजण्यासारख नाही आणि योजनेच्या मूळ उद्देशालाच कमकुवत करते.” असे म्हटले. विरोधी पक्षांचा गोंधळ, खासदार वेलमध्ये उतरले विधेयक सादर होताच, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी वेलमध्ये धाव घेतली. हातात फलक घेऊन घोषणाबाजी करण्यात आली आणि सभागृहात गोंधळ उडाला. विरोधकांनी विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. द्रमुक खासदार टीआर बालू यांनी विधेयक सादर करण्यास विरोध केला. तृणमूल काँग्रेस खासदार सौगत रॉय यांनीही सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आणि सभागृहात विधेयक सादर करण्यास विरोध केला. शिवराज सिंह चौहान यांचा पलटवार गदारोळाच्या दरम्यान, शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “महात्मा गांधी देशवासीयांच्या हृदयात राहतात. गांधीजी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय दोघेही समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी वचनबद्ध होते” असे त्यांनी म्हटले. तसेच ते असेही म्हणाले की, सरकार केवळ गांधीजींचाच नाही तर त्यांच्या विचारांचाही आदर करते”. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, महात्मा गांधींनी स्वतः रामराज्याबद्दल बोलले. त्यांनी प्रश्न केला की विरोधक “जी राम जी” च्या उल्लेखावर आक्षेप का घेत आहेत.?