Dr. Maithili tambe : राज्यात महापालिका निवडणुकीच्या अगोदर नगरपरिषद निवडणुका झाल्या. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून डॅा. मैथिली तांबे निवडून आल्या. पदभार स्विकारल्यानंतर मैथिली तांबे यांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. या निर्णयाची जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. संगमनेर नगरपालिकेचे उत्पन्न ५० कोटीपर्यंत होत नाही, तोपर्यंत आमचे नगरपालिकेचे नगरसेवकांसह अध्यक्षा, उपाध्यक्ष एकही रुपयाचे मानधन घेणार नाही, असा धाडसी निर्णय नगराध्यक्ष डॅा. मैथिली तांबे यांनी घेतला आहे. View this post on Instagram A post shared by Dr. Maithili Tambe (@dr.maithilitambe) हा पहिला मोठा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतल्याचे नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी स्पष्ट केले. संगमनेर नगरपालिकेची शुक्रवारी पहिली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. “संगमनेर नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर असणार आहे. ते ५० कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. तोपर्यंत एक रुपयाही मानधन घेणार नाही.” असे डॅा. मैथिली तांबे म्हणाल्या. हेही वाचा : Keerthy Suresh: कीर्ती सुरेशचा ‘डबिंग मॅरेथॉन’; सलग ९ तास काम, फोटो शेअर करत सांगितला अनुभव यासह इतर विविध महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सर्व नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कामकाजाचे, तसेच कुठे कमी पडतात, कुठे चांगले काम होते, याचा अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालाचे काम प्रजा फाउंडेशनला देण्यात आले आहे. त्यांच्या कामकाजाचे मूलमापन हे फाऊंडेशन करणार आहे. याशिवाय शहराच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बल आहे, त्यांना सामावून घेतले जाणार आहे. संगमनेरच्या अग्निशमन दलात दोन वाहने कमी आहेत, ती आधुनिक वाहने घेण्याचा निर्णय सगळ्यांनी एकत्र येऊन घेतला आहे, अशी माहिती डाॅ. मैथिली तांबे यांनी दिली. अतिक्रमण वाढलेले आहे. सर्व नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. लवकरच ही अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच शहरात भोंग्याची गाडी फिरवून माहिती दिली जाईल, असे डाॅ. मैथिली तांबे यांनी सांगितले. हेही वाचा : Terrorists Arrested : प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ४ दहशतवाद्यांना अटक