Top 10 News: केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणारा आणि नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजे मंगळवारी होण्याची शक्यता सांगितली जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदेशातून भारतात येतील आणि पुन्हा परवा दुसऱ्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार
श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट?
Top 10 News: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजे मंगळवारी होण्याची शक्यता सांगितली जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदेशातून भारतात येतील आणि पुन्हा परवा दुसऱ्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या एकच दिवस असल्याने उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात शिवसेनामध्ये आलेले खासदार, तृणमूलचे फुटीर खासदार, आपचे खासदार यापैकी काहींना संधी तसेच आधीच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. शिवसेनेकडे यावेळी एक कवीने मंत्रीपद येणार अशी सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. या संभाव्य विस्तारात श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर राज्यमंत्री पदासाठी प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. त्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांना देखील केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार,
ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली
ऑपरेशन टायगर अंतर्गत बंडखोर 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं. या सर्व फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी नव्यानं मोर्चेबांधणीस सुरूवात केलीये. यवतमाळचे बंडखोर खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघातून जाहीर सभेला सुरूवात केल्यानंतर आता रविवारी उद्धव ठाकरेंनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव मतदारसंघात जाहीर सभा घेतलीये. कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. तसेच या सभेत ठाकरेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ज्याचं कारण देऊन ओमराजेंनी ठाकरेंची मशाल सोडून शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेतलं त्यावरही उध्दव ठाकरेंनी बोट ठेवलं. दरम्यान ठाकरेंवर कुठलीही टीका करणार नसल्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांनी याआधीच स्पष्ट केलंय. मात्र, असं असलं तरी आपण कामातून उत्तर देणार असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय.
राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार,
हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय
राज्यात दाखल झालेल्या मॉन्सूनन गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतल्याचं बघायला मिळालं होतं. तर मॉन्सूनच्या पावसानं गंती संथ केल्यानं पावसाची बळीराजासह साऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिली होती. अशातच पावसानं पुन्हा एकदा जोर धरल्याचे बघायला मिळते आहे. दुसरीकडे, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 22 जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून, 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परिणामी महाराष्ट्रात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
सियानेच केतनच्या पासपोर्ट लपवून ठेवला
कब चालकाचा महत्वाचा जबाब
भायखळ्यात मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या;
आरोपी फैयाजने सांगितलं धक्कादायक कारण
मुंबईच्या भायखळ्यात मोहरमदरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या होत्या. या प्रकरणात आरोपी फैयाज निसार हुसैन प्रेमजी यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आले आहेत. सूडाच्या भावनेतून फैय्याज याने मोहरमचे निमित्त साधून समाजातील मुस्लीम बांधवांना धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. फैयाज आणि त्याचा भाऊ या दोघांना त्याच्या पत्नींनी सोडून दिले होते. या मागे समाजातील लोकांचा मोठा हात असल्याचा समज त्यांचा होता. यातून समाजाला धडा शिकवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच महिनाभरापासून फैयाज या कटाची तयारी करत होता. यासाठी मोबाइलच्या माध्यमातून “झिंक फॉस्फाईड” औषध कंपन्या, कॅप्सूल बनवण्याची पद्धत त्यांचे साहित याबाबतची माहिती इंटरनेटवरून गोळा केली होती. फैयायजच्या मोबाईलमधून याबाबतची माहिती त्याने इंटरनेटवर सर्च केल्याचे आणि लोकांना मारण्यासंदर्भातले चॅटिंगही आढळून आले आहेत.
थायलंडमध्ये नोकरीचं आमिष,
८०० भारतीय ओलीस Top 10 News:
थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांसह तब्बल ८०० भारतीयांना म्यानमार सीमेवर ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणांना बंदुकीच्या धाकावर १८-१८ तास सायबर फसवणुकीचं काम करण्यास भाग पाडलं जातंय. नकार दिल्यास त्यांना विजेचे शॉक आणि अमानुष मारहाण केली जातीय. या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटमधून तरुणांच्या सुटकेसाठी बीड पोलिसांनी थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला.मिळालेल्या माहितीनुसार, चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील कुख्यात ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरात ओलिस ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. म्यानमार, थायलंड आणि लाओस या देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘गोल्डन ट्रँगल’ म्हटले जाते. बीडमधील एका तरुणाच्या धक्कादायक फोनमुळे मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू
लडाखस्थित सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर याठिकाणी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलं आहे. नीट पेपरफुटी आणि सीबीएसईमधील अनियमिततेच्या विरोधात जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी 20 जूनपासून आंदोलन करत आहे. उपोषण सुरू होताच आंदोलक आणि विद्यार्थी जंतर मंतर येथे जमा होऊ लागले. अनेक शेतकरी नेतेही या आंदोलनात सामील झाले. उपोषण सुरू करण्यापूर्वी सोनम वांगचुक आणि पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटाला भेट दिली. यापूर्वी, पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे म्हटले होते.
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर मोठा हल्ला
३४ जण ठार ,अनेक जण जखमी
पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेजवळ मोठी लष्करी कारवाई करत अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. या कारवाईत ३४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी या हल्ल्यांची पुष्टी करत, पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील दहशतवादी तळांवर पूर्वनियोजित कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि कराचीतील पाकिस्तान रेंजर्स (सिंध) यांच्या तळांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये चार पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही लष्करी मोहीम राबवण्यात आल्याचा दावा पाकिस्तानन केलाय.
नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला
अवघ्या एका धावेने भारताचा पराभव
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंडने भारताचा अवघ्या 1 धावेने पराभव करत मालिका 2-0 अशी खिशात घातली. यासह आयर्लंडने इतिहास रचत पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताला पराभूत केले. ही मालिका भारतीय संघासाठी अनेक अर्थांनी निराशाजनक ठरली. नव्या टी-20 कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली भारताला टी-20 इतिहासात प्रथमच मालिका गमवावी लागली. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वावर पहिल्याच मालिकेत पराभवाचा शिक्का बसला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला विजयासाठी चांगली संधी होती. मात्र अखेरच्या क्षणी भारतीय फलंदाजांना आवश्यक धावा करता आल्या नाहीत आणि संघाला केवळ 1 धावेने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह आयर्लंडने केवळ सामना जिंकला नाही, तर भारतीय संघाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजयही नोंदवला.
‘दर्याभवानी’चा फर्स्ट लूक आऊट!
‘या’ दिवशी चित्रपटगृहात धडकणार Top 10 News:
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित ‘श्री शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सातवा आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘दर्याभवानी’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने सोशल मीडियावर मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, या पोस्टर अनावरण सोहळ्याला दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांची उपस्थिती लाभली, त्यामुळे या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. पोस्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याची भव्य झलक पाहायला मिळते. ‘ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी आणि ज्याच्याकडे समर्थ आरमार त्याचा समुद्र’ या शिवरायांच्या दूरदर्शी विचारांवर आधारित हा चित्रपट हिंदवी स्वराज्याच्या आरमारी शक्तीचा इतिहास मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. स्वराज्याची सागरी सुरक्षा, जलदुर्गांची उभारणी, आरमाराची निर्मिती आणि समुद्रावरील मराठी वर्चस्व यांची थरारक कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे.




