राज्यात पुन्हा 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या Top 10 News : राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी IAS तुकाराम मुंढे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता महिनाभरात पुन्हा एकदा ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात आयएएस रेवैया डोंगरे , आयएएस मंगेश जोशी, आयएएस कुलदीप जंगम, आयएएस कुशल जैन, आयएएस डॉ. बी. एन. पाटील या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.या सगळ्यांची विविध शहर आणि वेगवेगळ्या विभागात बदली करण्यात आलीय. खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाचा प्रताप उघड एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना दुसरीकडे मुंबईतील मालाडमध्ये भोंदूबाबाच्या प्रतापांमुळे स्थानिक हैराण झालेत. मालाडमध्ये राहणारा हा भोंदू बाबा “आपल्या अंगात रविवार आणि गुरुवार या दोन दिवशी देवी येते आणि मी अनेकांच्या शरीरातील भूत उतरवतो” असं म्हणत जादूटोणा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. मालाड पूर्वेला राहणारा रिदम पांचाळ हा व्यक्ती रविवार आणि गुरुवार लोकांची सेवा करतो असं म्हणत जादूटोणा करत असल्याचा आरोप त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिकांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून दर आठवड्याच्या रविवारी आणि गुरुवारी अघोरी पूजा करतो आणि त्याला अंगात देवी आल्याचे म्हणत इतरांच्या अंगातील भूत उतरवतो असं सांगतो. आतापर्यंत त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता. मात्र 4 एप्रिलला त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचे काही फोटोज व्हिडिओसुद्धा आता व्हायरल झालेत. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट नाशिकच्या नामांकित कंपनीमधील महिला अत्याचार छळवणूकीतआणि धर्मांतर प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेली निदा खान मात्र गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे. कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलीय. कंपनीतील तरुणींना आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचार होताना धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश ठेवून अनेक कारनामे या निदा खानच्या सांगण्यावरून घडत होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. कंपनीची HR अश्विनी चैनाणी हिला पोलिसांनी अटक केली आणि तिची कसून चौकशी केली असता. या प्रकरणात निदा खान ही हे सर्व घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आली आहे. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसाठी दीर्घकालीन अंदाज जाहीर केलाय. त्यानुसार भारतात यंदा मान्सूचा पाऊस सरासरीपेक्षा कमी होऊ शकतो. सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. यंदा अलनिनोचा भारतीय उपखंडात मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असून, मुंबईत 1 मेपासून 10 टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून 10 टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांत सध्या 33.60 टक्के पाणीसाठा असून तो 7 जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढून धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं ऑगस्टपर्यंतचं पाणी पुरवठ्याचं नियोजन केल्यास पाणी कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या काळात मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात Top 10 News : महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून पुढील 2 दिवस हे विशेष अधिवेशन होणार आहे, 2029 च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण कायदा लागू करण्याच्या उद्देशाने आणलेल्या या विधेयकाचे अधिकृत नाव ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असे आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. यासाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार असून, लोकसभेत सध्या 543 खासदार आहेत. ही संख्या 850 पर्यंत वाढणार आहे. यात संविधान (131वा दुरुस्ती) विधेयकाद्वारे अनुच्छेद 81 मध्ये बदल करण्यात येणार आहे. तसेच लोकसंख्येची नवी व्याख्या निश्चित केली जाणार असून, संसदेद्वारे मान्य केलेल्या जनगणनेनुसारच प्रतिनिधित्व निश्चित होईल.सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी जागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर महिला आरक्षण विधेयक आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरुन सध्या राजधानी दिल्लीचं वातावरण चांगलंच तापलंय. भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात आज सकाळी भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. कुर्नूल जिल्ह्यातील चिलाकलाडोनाजवळ एका बोलेरो आणि ट्रकमध्ये जोरात धडक झाली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झालेत. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येतीय. जखमींना उपचारासाठी एमिगनूर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृत व्यक्ती कर्नाटकातील यात्रेकरू होते. सर्वजण तिर्थयात्रेसाठी जात होते त्याचवेळी काळाने घाला घातला. युद्धामुळं जगात गरिबांची संख्या वाढणार जगात कुठेही युद्ध झालं तरी त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होत असतात. रशिया- युक्रेन युद्धावेळी जगावर आर्थिक संकट कोसळलं होतं.त्यातच सुरू झालेलं आखाती युद्ध आता भारतासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच ‘यूएनडीपी’च्या (UNDP) अहवालानं अनेक देशाची झोप उडवलीय. युद्धामुळे इराणमध्ये 50 लाखाहून अधिक लोक गरिबीत ढकलले जातील. त्यानंतर भारतात 24 लाख 64 हजार 698 लोकं गरिबीच्या खाईत लोटले जातील. त्याशिवाय चीनमध्ये 6 लाख 22 हजार 735 तर पाकिस्तानात 4 लाख 21 हजार 964 दारिद्र्य रेषेखाली जातील. दरम्यान यूएनडीपीच्या अहवालानुसार, सध्या सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात ऊर्जा आणि इंधन क्षेत्राशी संबंधित उद्योगांना सर्वाधिक फटका बसेल.पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होऊन वाहतुक महागेल.. ज्यामुळे भाजीपाला अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडतील…निर्यात-आयात क्षेत्रालाही युद्धाची झळ बसेल, कापड उद्योग, चामड्याच्या वस्तू आणि हिरे-दागिने यांच्या निर्यातीवर परिणाम होऊन असंघटित कामगार बेरोजगार होतील असं म्हटलंय. विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली आहे. त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठी आढळल्या असून ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कांबळीच्या जुन्या मित्रांनी आर्थिक मदतीसाठी एका व्हॉट्सअॅप ग्रुप देखील बनवला आहे. या ग्रुपमध्ये सचिन तेंडुलकर देखील आहे. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने दारू पिणे सोडले आहे. परंतु त्याची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. यामुळे सिगारेट ओढण्याचा चुका कांबळी करताना दिसतो. यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला आहे. ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात युरिनरी इन्फेक्शनचा उपचार केल्यानंतर ५४ वर्षीय विनोद कांबळी बरा झाला होता. त्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्या होत्या होत्या. परंतु काही महिन्यानंतर त्याची तब्येत पुन्हा बिघडलीय. आरसीबीचा शानदार विजय गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेगळुरूने आयपीएल २०२६ च्या २३ व्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. घरच्या मैदानात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सचा ५ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ २० षटकांत १४६ धावांवर ऑल ऑऊट झाला होता. प्रत्युत्तरात,आरसीबीने १६ व्या षटकात ५ गडी गमावून १४७ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. या विजयासह आरसीबीने या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला. राजस्थान रॉयल्सला मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. ५ सामन्यांत ४ विजयांसह आरसीबीचे आता ८ गुण झाले आहेत. राजस्थानचेही ८ गुण आहेत, परंतु आरसीबीचा नेट रन रेट अधिक चांगला आहे. ललित प्रभाकर साकारणार नामदेव ढसाळांची भूमिका Top 10 News : दलित पँथरचे प्रणेते आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित ‘ढसाळ’ या चरित्रपटाची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली असून, त्याचे भव्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत मुंबईत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत झळकणार असून, नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमधून त्यांचा दमदार आणि प्रभावी लूक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. ललितचा हा बंडखोर आणि तडफदार अंदाज चित्रपटासाठी मोठं आकर्षण मानलं जातय. संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत, वरुणा मदनलाल राणा निर्मित ‘ढसाळ’ हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन वरुणा राणा यांनी केले असून, संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहेत.