नारायण राणेंविरोधात मानहानीचा दावा Top 10 news: राज्याच्या राजकारणात भाजप खासदार नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतीलवाद सर्वश्रुत आहे. दरम्यान याचं वादान आता कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आलीय. जानेवारी 2023 रोजी नारायण राणे यांनी भांडुप येथील कोकण महोत्सवात संजय राऊत यांच्या खासदारकी बाबत एक विधान केले होते. आता नारायण राणे यांनी केलेल्या विधानांमुळे मानहानी झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याचिकेद्वारे केलाय. या प्रकरणी माझगाव न्यायालयात संजय राऊत यांनी आपली साक्ष नोंदवली आहे. त्यामुळे 2023 रोजी नारायण राणे यांनी केलेल्या या विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं असून न्यायालय या प्रकरणी नेमकं काय निर्णय देतं हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. “एकेकाळी मी शिवसेना चालवत होतो, हे त्यांना दाखवायचे होते. माझ्यासारख्या नेता आणि राज्यसभा खासदाराची बदनामी केल्याने व लोकांची राज्य घटनेवरील विश्वास उडला. म्हणून मी हा खटला दाखल केला”, संजय राऊत यांनी साक्ष दाखल करताना म्हटला आहे. Top 10 news: चंद्रपूर महापालिका प्रकरणावर काँग्रेसचे वरिष्ठ नाराज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी आज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रासह इतर 6 राज्यांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीपर्यंत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर चंद्रपूर महानगर पालिकेतील महापौर- उपमहापौर पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवा बद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितल्याची माहिती समोर आलीय. बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांची वडेट्टीवार यांनी माफी मागितली. यावर नंतर बोलू अस म्हणत वरिष्ठांनी या विषयावर बोलणं टाळल्याचं सांगण्यात येतंय. भाजप-राष्ट्रवादीने सदस्य गोव्याला हलवल्याचा आरोप रायगडमधील राजकारण आणखी तापले आहे. रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी वेगळी चूल मांडणाऱ्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगटाची महायुती तुटण्याची चिन्ह दिसत आहेत. जिल्हा परिषद निवडणूक पार पडल्यापासून याठिकाणी आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. अशामध्ये भाजप, राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती आहे त्यामुळेच त्यांनी गोव्याला सदस्य हलवले असल्याचा टोला मंत्री भरत गोगावले यांनी लगावलाय. रायगड जिल्हा परिषदेच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांना गोव्याला पाठवण्यात आले आहे. यावर बोलताना आम्ही त्यांचे सदस्य उचलू अशी भीती त्यांना असेल असं सांगताना आम्ही एकतरी सदस्य हलवला का? असा खोचक प्रश्नरूपी टोला मंत्री भरत गोगावले यांनी लगावला. यावेळ राष्ट्रवादी-भाजप युतीवर बोलताना ‘आम्हाला दूर ठेवलं, तर पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत, शिवसेनेची गरज लागेल, तेव्हा आम्ही पाहू काय करायचं ते’, असा इशाराही भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला दिला आहे. कोकणी चाकरमान्यांसाठी खुशखबर कोकणकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिमग्याआधी कोकणी माणसासाठी फडणवीस सरकारनी मोठी घोषणा केली आहे. आता शिमग्याला कोकणात बोटीने जाता येणार आहे. येत्या 1 मार्चपासून समुद्री मार्गे तळकोकणात जाता येणार आहे. या संदर्भांत एम टू एम फेरीचं नियोजन करण्यात आलं असून या प्रवासाचं वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात घोषणा देत वेळापत्रकाची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे शिमग्याला कोकणात जाणाऱ्या कोकणी माणसाला काहीसा दिलासा मिळाला असून हा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीचा होईल असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधारगृहात रवानगी करण्याचा निर्णय इंदापूर तालुक्यातील भिगवण प्रकरणातील अपहरण झाल्याची तक्रार असलेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली. संबंधित तरुणासह मुलगी भिगवण पोलीस ठाण्यात पोहोचली. यानंतर पोलीस संबंधित तरुणाला दुसरीकडे घेऊन गेले होते. यानंतर मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. पोलिसांनी संबंधित तरुणीला साडे बारा वाजता कोर्टात हजर केलं. यानंतर संबंधित तरुणीची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, मुलाची चौकशी करुन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. Top 10 news: राज्यावर अवकाळीचं संकट Top 10 news: राज्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये उकाडा वाढला असून उन्हाचे चटके लागू लागले आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सर्वांसाठी महत्वाचे राहणार आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ११ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार पुण्यामध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. पुण्यातील गुलटेकडी परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. अल्पवयीन सराईत आरोपीने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने दोन ते तीन राऊंड फायर केले. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्याने हवेत गोळीबार केला. दोन गटातील वादातून हा गोळीबार झाला आहे. गोळीबारामध्ये कुणीही जखमी नाही, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली. मध्यरात्री घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे गुलटेकडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील ७ जण ठार गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघात झाला असून यामध्ये ७ जणांचा दु्र्दैवी मृत्यू झाला. वलसाड जिल्ह्यातील कपराडा परिसरातील कुंभघाटाजवळ पहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. भरधाव कार आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. , या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण अंबा वन परिसरात राहणारे होते. मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. अपघातामध्ये कुंभघाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.गुजरात पोलिस अपघाताचा तपास करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५-२६ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीपूर्वी, भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्याची तयारी करत आहेत. दोन्ही देश नवीन संरक्षण तंत्रज्ञानावर संयुक्तपणे सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. या भेटीदरम्यान सुरक्षा सहकार्याबाबत सामंजस्य करार (एमओयू) होण्याची अपेक्षा आहे. परंतु, दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य आधीच सुरू असल्याने कोणतेही मोठे संरक्षण करार केले जाणार नाहीत. येत्या काळात हे सहकार्य अंदाजे १० अब्ज डॉलर्सचे असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वीचा तो तडकाफडकी निर्णय मागे Top 10 news: भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलत, दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत. या सेवा जवळजवळ दोन महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आल्या होत्या. तारिक रहमान यांनी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बांगलादेश अस्थिर झाल्यापासून दुरावलेल्या संबंधामधील कटूता कमी करण्यासाठी तारिक रहमान यांनी फक्त बोलून शांत न बसता प्रत्यक्षात कृती करत असल्याचे दिसून येत आहे.