सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवार मैदानात Top 10 News : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत आता रंगत आलीय. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर या पोटनिवडणुकीसाठी तब्बल 19 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हेदेखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी इच्छाही बोलून दाखवली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध न होता सुनेत्रा पवार यांच्याविरोधात 20 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी न होता काहीशी रंगतदार होऊ शकते. सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात असले तरी लक्ष्मण हाके रिंगणात उतरल्यास बारामतीच्या पोटनिवडणुकीत रंजक घडामोडी पाहायला मिळू शकतात. मी पतिव्रता म्हणणारी महिला मोठं कुंकू लावते बुलढाण्यातील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची भेट घेतल्यानं त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. त्याच,अनुषंगानं त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोंद्रे यांची जीभ घसरली. चिखलीचे माजी आमदार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यावेळी यांनी महिलांचा नामोल्लेख करत दिलेलं उदाहरण वादाचा मुद्दा बनलंय. तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहात का? या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना राहुल बोंद्रे यांची जीभ घसरली. “जी कुणी महिला असते… जीला दाखवाव लागतं की, मी पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते”, असं वादग्रस्त उत्तर त्यांनी दिलं. तसेच देवीची यात्रा होती, यात्रेविषयी चर्चा झाली. यात्रेत झालेली भेट होती. त्याच्याविषयी काहीच नव्हतं असं त्यांनी म्हटलं.दरम्यान, राहुल बोंद्रे यांच्या या महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुलं आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांसाठी नवा ‘पॅटर्न’ टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांच अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. ज्यामध्ये संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत सर्वत्र दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत. गावात भोंगा वाजून या वेळीची सूचना दिली जाईल. तसेच एका अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देत यावर देखरेख ही ठेवली जाणार आहे. जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायतीचा यामध्ये सहभाग करून घेणार असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितलं.शिवाय जिल्हा परिषद शाळेत पुन्हा एकदा सेमी इंग्लिश पॅटर्न राबवला जाणार आहे. तसेच वाचन संस्कृती वाढावी यासाठी वाचन मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितलं. या अभिनव उपक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा असून धाराशिवकरांकडूनही या निर्णयाचं स्वागत केल्या जात असल्याचं बोललं जात आहे. खरातचे 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार भोंदूबाबा अशोक खरातचे एकापेक्षा एक कारनामेही रोज समोर येत आहेत. त्यातच, अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांच्या प्रकरणाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहाता येथील समता पतसंस्थेत 100, तर सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेत 32 खाती असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी या बाबत धक्कादायक माहिती देत कबुली दिली आहे. शिर्डी पोलिसांनी बँक खात्यांसंदर्भात चौकशी केली असता, सर्व 32 खात्यांना अशोक खरात नॉमिनी असल्याचे पुढे आले आहे. तर या 32 खात्यांमध्ये 2 कोटी 74 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचीही माहिती आहे. अशोक खरात याने स्वतः सगळी कागदपत्र देऊन खाती उघडली. सोबतच खरात याने सर्व खात्यांची जबाबदारी घेतली होती, अशी देखील माहिती आहे. मात्र ज्यांच्या नावाने खाती उघडली गेली, त्यांचा आणि पतसंस्थेचा कधीच प्रत्यक्ष संबंध आला नाही. अशोक खरात यांनीच पैसे टाकले आणि कालांतराने काढून घेतले. अशोक खरातच्या प्रभावामुळे माझ्याकडून चूक झाली. अशी कबुली आता जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली आहे. तुमच्यासमोर नाही तर कुणासमोर रडू … Top 10 News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याचं बारामतीत नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात जय पवार यांनी विविध मुद्दे मांडले. जय पवार यांनी यावेळी, ही बारामती दादांची आहे, तुमच्यामुळे दादा होते. 28 तारखेला थोडसं रडलो मात्र हे दादांचा रक्त आहे शेवटपर्यंत थांबणार नाही, असं त्यांनी म्हटलं. यावेळी जय पवार बोलताना भावनिक झाल्याचं दिसताच कार्यकर्त्यांकडून न रडण्यास सांगण्यात येत होत. त्यावेळी जय पवार यांनी मी तुमच्यासमोर रडू नाहीतर कुणासमोर रडू, दादा आपल्यात नसतील पण दादा आपल्या हृदयात आहेत. असं म्हणत आपल्या भावना बोलून दाखवल्या. बारामतीमध्ये विकास कामं दिसतात ती फक्त दादा आणि साहेबांमुळे आहेत असं म्हणत अजितदादांनी केलेल्या कौतुकाची आठवण देखील जय पवार यांनी सांगितली. एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिमाण देशभरातील घरगुती व व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठ्यावर झाला आहे. मात्र असं असलं तरी आता इंडियन ऑइलकडून घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या दररोज सुमारे २८ लाख गॅस सिलिंडर वितरित केले जात आहेत, जे भौगोलिक- राजकीय तणावापूर्वीच्या नेहमीच्या पातळीप्रमाणे आहेत. ग्राहकांनी गॅस रिफिल बुक करण्यासाठी भ्रमनध्वनीवर SMS आणि IVRS सारख्या डिजिटल पद्धतींचा वापर करावा, असंही आवाहन इंडियन ऑइल कंपनीकडून करण्यात आलंय. सध्या सुमारे ८७ टक्के नोंदणी डिजिटल माध्यमातून होत आहेत. ट्रम्पकडून इराणला 48 तासांचा अल्टीमेटम अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला 36 दिवस झाले आहेत. मात्र, अमेरिका किंवा इराण मागं हटण्यास तयार नाही. या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक इशारा दिला आहे. इराणनं दिलेल्या वेळात होर्मुझची सामुद्रधुनी सुरु न केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे, लागतील, असं ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवर पोस्ट करून वेगात वेळ जात असल्याचं म्हटलं. अमेरिकेनं करार करण्यास आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास 48 तासांचा वेळ दिला आहे. तर दुसाराकडं इराणने ट्रम्प यांचा अल्टिमेटम फेटाळून लावत त्यांचा निर्णय असहाय्यता दर्शवत असल्याचं म्हटलंय. ..तर आम्ही भारताच्या कोलकातापर्यंत हल्ले करू गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सध्या वाढला आहे. त्यातच आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी भारताला थेट धमकी दिली आहे. त्यांनी पाकच्या स्थानिक माध्यमांशी बोलताना, जर आता भारताने कोणता कट रचून पुन्हा एकदा पाकिस्तानच्या विरोधात कोणतेही ऑपरेशन केले तर आता आम्ही थेट कोलकात्यापर्यंत घुसून हल्ला करून अशी धमकी दिलीय. तसेच जर भारतान हल्ला केला, तर पाकिस्तानच प्रत्युत्तर ‘जलद, विचारपूर्वक आणि निर्णायक’ असेल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. राजस्थानचा ‘रॉयल’ विजय! नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर 6 धावांनी मात केली. एकवेळ गुजरातचा विजय सोपा वाटत होता, कारण त्यांनी विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत केवळ 15 धावांची गरज होती. पण राजस्थानच्या जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडेने सामना फिरवला. 6 चेंडूत गुजरातला विजयासाठी 11 धावांची गरज असताना तुषार देशपांडेने अतिशय अचूक गोलंदाजी केली. त्याने शेवटच्या षटकात केवळ 4 धावा खर्च करून गुजरातच्या फलंदाजांना जखडून ठेवले आणि राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.राजस्थानच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो लेग स्पिनर रवि बिश्नोई. बिश्नोईने 4 षटकांत 41 धावा देत गुजरातच्या 4 महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. सुनंदा शर्माच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गोंधळ Top 10 News : पंजाबी गायिका आणि अभिनेत्री सुनंदा शर्मा हिच्या गाझियाबादमधील एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान धक्कादायक घटना घडली. कॉन्सर्ट पाहायला आलेल्या एका तरुणाने सुनंदा हिला स्टेजवर येऊन स्पर्श केला. यादरम्यान गायिका भर कॉन्सर्टमध्ये जोरात किंचाळली.सुनंदाच्या मायक्रोफोनमुळे तिचा तो आवाज संपूर्ण कॅम्पसमध्ये घुमला. त्यानंतर ती घाबरून बॅकस्टेजला पळून गेली. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्या तरुणाला तात्काळ घटनास्थळावरून पकडले.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच या घटनेने कलाकारांच्या सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले.