आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंना यश Dhananjay Munde Top 10 news: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांना आणखी एका न्यायालयीन लढ्यात यास आलय. कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आली. त्यामध्ये अनियमितता करून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला व संबंधितांचे आरोप फेटाळून लावल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. vsr च्या मालकाला आता करा अन्यथा लढा उभारू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी काल ‘व्हीएसआर व्हेंचर्स’चे मालक रोहित सिंग यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ ‘ट्वीट’ केला होता. त्यामध्ये रोहित सिंग हा वैमानिकाच्या बाजूला झोपलेला दिसत आहे. असाच बेजबाबदारपणा अजितदादांच्या विमाना अपघातावेळी झाला होता का? असा सवाल जय पवारांनी केला आहे. जय पवारांच्या या शंकेचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही समर्थन केलं आहे. यासंदर्भात सरकारने ‘व्हीएसआर व्हेंचर’चा मालक रोहित सिंगला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. यासोबतच अधिक चौकशीसाठी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनाही सरकारने ताब्यात घ्यावं, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या संपूर्ण लढ्यात राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते जय पवार यांच्या सोबत असल्याचच आमदार मिटकरी म्हणाले. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारने रोहित सिंगला अटक न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लढा उभारतील, असेही आमदार अमोल मिटकरी म्हणालेत. महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला? देशासहित राज्यातील राजकीय पक्षांना राज्यसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत एक जागा जिंकण्याची संधी आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांना राज्यसभेवर पाठण्याचे निश्चित झाल्याचं सांगण्यात येतंय. काँग्रेस पक्षाकडून हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये स्थानिक उमेदवारांना राज्यसभा तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एकच जागा जिंकण्याची संधी आहे. या जागेवर शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय असं म्हटलं जातंय. एप्रिल महिन्यात शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान, रामदास आठवले, भागवत कराड, रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपणार आहे.राज्यसभेतील ७ जागांसाठी अर्ज करण्यासाठी ५ मार्च अंतिम तारीख आहे. तर निवडणूक १६ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. मुरलीधर मोहोळांकडून जय पवारांच्या व्हिडिओची दखल राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला झालेल्या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं देशरात शोककळा पसरली. याच अपघातासंदर्भात अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक व्हिडीओ शेअर करत शंका उपस्थित केली होती . तसेच विमान कंपनीचा बेजबाबदारपणा सांगणारा पुरावा जगासमोर आणला होता. दरम्यान, आता या व्हिडिओची दखल नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून घेण्यात आलीय. त्यासंदर्भात बोलताना हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, जय पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला आहे. मी तो व्हिडिओ पाहिला आहे, योग्य ती दखल घेतली जाणार, असे मंत्री मोहोळ यांनी म्हटले. लाडक्या बहिणींचे पैसे मिळण्याची संभाव्य तारीख समोर Top 10 news: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. दरम्यान, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली आहे. फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. मार्च महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. त्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये योजनेबाबत तरतुद केली जाऊ शकते. यानंतर लगेचच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे येत्या ४ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येतील, असं बोललं जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना पत्र इराणविरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढलाय. अमेरिका- इस्रायल तेहरानसह अनेक बड्या शहरात सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे. तेहरानमध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते.दरम्यान , या युद्धाचे पडसाद हे भारतावरही पडण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकार सतर्क झालंय. त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना पत्र पाठवण्यात आलंय. यामध्ये इराणवर अमेरिका आणि इस्रायल हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात संभाव्य हिंसाचारापूर्वी सतर्क राहा. २८ फेब्रुवारीला हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. ज्यात राज्यांना भडकाऊ भाषण देणाऱ्या इराणी कट्टर समर्थकांची ओळख पटवा असं सांगितलं होतं. या पत्रात मध्य पूर्व आशियात सुरू असणाऱ्या युद्धानंतर भारतातील अनेक भागात होणाऱ्या विरोध प्रदर्शनाबाबत सतर्क केले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाबाबतही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. PF वरील नवीन व्याजदर निश्चित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने २०२५-२६ साठी पीएफ खात्यावरील व्याजदर निश्चित केले आहे. सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत महा हत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. आता पीएफ ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के असणार आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही व्याजदर तेच असणार आहे. ईपीएफओने पीएफवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सलग दुसऱ्या वर्षी व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये २०२४-२५ साठी व्याजदर जाहीर केले होते. मागच्या वर्षीदेखील व्याजदर ८.२५ टक्के ठेवले होते. या निर्णयानंतर अर्थमंत्रालयाच्या मंजुरीसाठी वाठवला जाईल. सरकारच्या मंजुरीनंतर ईपीएफओ खात्यावर व्याजदर दिले जाईल. कोट्यवधी कर्मचाऱ्यांना हे व्याजदर मिळणार आहे. इराण-इस्त्रायलचे युद्ध बळीराजाच्या पथ्यावर इस्त्रायल आणि इराण युद्धाचे चटके आता फक्त पश्चिम आशियालाच नव्हे तर जगभरात बसत आहेत. कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशाला त्याचे अधिकच नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे. युद्धाला तोंड फुटून चारच दिवस झालेत तर त्याची झळ आता देशातील सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसताना दिसत आहे. भारताचा पश्चिम आशियाशी होणारा मोठा व्यापार हा हॉर्मुजच्या सामुद्रधुनीच्या मार्गे होतो. या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा आहे. आता युद्धामुळे इराणने ही सामुद्रधुनी बंद केली आहे. परिणामी भारताचा जवळपास 50 टक्के व्यापार हा प्रभावित होण्याची शक्यता आहे. या सामुद्रधुनीच्या मार्गे भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. जर इतर मार्गे व्यापार करायचा ठरवला तर जहाजांचा विमा प्रिमियम वाढतो, मालवाहतुकीचा खर्च वाढतो. त्यामुळे त्याचा परिणाम हा आयात-निर्यातीवर होऊ शकतो. गरज पडल्यास जमिनी युद्धास आम्ही तयार – ट्रम्प इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर आता पश्चिम आशियातील परिस्थिती दिवसागणिक अधिक चिघळली असून त्याचा जगावरही परिणाम झाल्याचं दिसून येतंय. अशातच इराणवरील सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलंय. त्यांनी इराण-इस्रायल युद्धात गरज पडल्यास ते इराणमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्याची आमची तयारी आहे.असं म्हणत या युद्धाची तीव्रता किती वाढू शकते याचा अंदाज जगाला करून दिलाय. ऑपरेशन एपिक फ्युरी “वेळेच्या खूप आधी” प्रगती करत आहे, ज्यामध्ये तेहरानचे डझनभर उच्च अधिकारी मारले गेले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात, प्रत्येक अध्यक्ष म्हणतो की ते जमीनी सैन्य पाठवणार नाहीत, परंतु ते तसे करत नाहीत.असेही म्हटले आहे.तसेच “जर मी ओबामाचा भयानक इराण अण्वस्त्र करार रद्द केला नसता, तर तीन वर्षांपूर्वी इराणकडे अण्वस्त्रे असती. हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक करार होता आणि जर तो तसाच राहिला असता, तर आज जग पूर्णपणे वेगळे असते. यासाठी तुम्ही बराक हुसेन ओबामा आणि जो बायडेन यांना दोष देऊ शकता.” असं म्हणत टीका केलीय. ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या -जावेद अख्तर Top 10 news: Javed Akhtar प्रसिद्ध गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी अमेरिके-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावावर भाष्य करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणाऱ्या जावेद अख्तर यांनी यावेळीही ठाम शब्दांत मत मांडले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी, यावेळी ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या आहेत. इराणशी इराकसारखे वर्तन करण्याची मुभा दिली गेली, तर चीनसारख्या देशाची जागतिक विश्वासार्हता धोक्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, बलप्रयोगाची भाषा करणारे नेते इतर देशांना प्रत्युत्तर देण्यास भाग पाडत आहेत आणि त्यामुळे तणाव अधिक वाढत आहे.’असं म्हटलंय.