कोल्हापूर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांना किणी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. रात्री साडेअकरा वाजेदरम्यान ही घटना घडली.
लोकसभा कामकाज आटोपून कोल्हापूरला परत येत असताना मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांना टोल कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेचआम्ही पोलीस आणि आयएएस अधिकाऱ्यांना विकत घेवू शकतो, असा दम देखील टोलच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिला. अमन मित्तल यांनी तात्काळ पेठवडगाव पोलीस स्टेशन मध्ये संबंधित टोल कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.