नवी दिल्ली – अफगाणिस्तानातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथील भारताचे राजदूत आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना भारतात सुखरूप परत आणण्यात आले आहेत. अफगाणिस्तान आता तालिबानच्या ताब्यात आले आहे. त्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भारतात या घटनेवरून वादग्रस्त वक्तव्य करण्याची चढाओढ लागली आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदारानंतर भाजपच्या आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं. “ज्या लोकांना भारतात राहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे” असं आमदाराने म्हटलं आहे. हरिभूषण ठाकूर असं या भाजपा आमदाराचं नाव आहे.
आमदार ठाकूर यांच्या विधानाने नवीन वाद निर्माण झाला आहे. ठाकूर यांनी “अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र ज्या लोकांना येथे देशात राहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात जावं, तिथे पेट्रोल देखील स्वस्त आहे” असं म्हटलं आहे.
दरम्यान आमदार ठाकूर यांच्या या विधानाचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेण्यात येत आहे.