मुंबई – क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. या छापेमारीवर पाहिल्याचं ठाकरे सरकारच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडीतील पक्षांनी ११ ऑॅक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे . ते म्हणाले,’सीबीआय, ईडी, आयकर अशा सर्व केंद्रीय यंत्रणांना उभ्या देशात कोणतेही काम नाही. सर्व भ्रष्ट माणसे महाराष्ट्रातच आहेत, अशा पद्धतीने काम सुरू आहे. महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे असे प्रकार सुरू आहेत. यातून महाराष्ट्राच्या अर्थकारणावर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केले आहे.