मुंबई – राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यासोबतच करोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्य लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी वेळोवेळी केला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्युदर सांगा की!, असेही त्यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे.
गुजरातचा मृत्युदर सांगा की!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 14, 2020
दरम्यान, राज्यात रविवारी करोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.