सिंधुदुर्ग – शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनाशी संवाद साधताहेत. आज आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री असताना कोकणच्या पर्यटनासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला यावेळी जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले.
या दरम्यान घेण्यात आलेल्या सभेतून आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर निशाणा साधला. लिहून घ्या, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच अशी गर्जना यावेळी आदित्य ठाकरेंनी केली. तसेच गद्दारी महाराष्ट्र कधीही खपवून घेत नाही असं देखील यावेळी ते म्हणाले. आदित्य ठाकरे हे आज शिवसेनेचे पारंपरिक प्रतिस्पर्धी नारायण राणे यांच्या कोकणात होते त्यामुळे ते काय बोलणार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
काय म्हणाले नेमकं आदित्य ठाकरे
राज्यात जम्बो मंत्रिमंडळ आहे,मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण हेच समजत नाही.
असं घाणेरडं राजकारण मी कधीही पाहिलं नाही.
ज्या माणसाने तुम्हाला सर्वकाही दिल त्याच्याच पाठीत खंजीर खुपसा ही महाराष्ट्राची ओळख कधीही नव्हती
इकडून ५ फोड तिकडून १० फोड अशी सरकार बनायला लागली तर देशात अस्थिरता निर्माण होईल
ठाकरे परिवार तुम्ही संपवू शकत नाही कारण माझा ठाकरे परिवार इथं उभा आहे.
उद्धव ठाकरेंच्या वाईट काळात यांनी पाठीत खंजीर खुपसला.
वार छातीवर करायचा होता,पाठीत का ? असा सवाल शिंदे गटाला ठाकरेंनी यावेळी विचारला.
थोडी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला समोर जा.
४० जागांवर निवडुका घ्या मग कळेल सत्य जिंकत की सत्ता जिंकते
ज्या गद्दारांना असं वाटत असेल ज्यांची चूक झाली त्यांनी परत या त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायम खुले असतील.