रत्नागिरी – महाविकास आघाडी सरकारला बदनाम कसे करता येईल, एवढेच देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. खरंतर देवेंद्र फडणवीस “मी पुन्हा येईल’ असे म्हणाले होते. पण त्यांना पुन्हा येता न आल्यामुळे ते फ्रस्ट्रेट झाले आहेत, असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लगावला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार वादळसदृश्य भागात पोहोचत नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय राज्य सरकारची नुकसानग्रस्त भागात अजूनही मदत पोहोचलेली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या याच दाव्याला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले.