Prime Minister Modi – जर एखाद्या लिपिक किंवा शिपायासारख्या छोट्या सरकारी कर्मचाऱ्याला ५० तास पोलिस कोठडीत ठेवले तर त्याला निलंबित केले जाते, परंतु भारतातील भ्रष्टाचारामुळे तुरुंगात टाकलेल्या राजकारण्यांना हा कायदा लागू होत नाही. हे चुकीचे आहे. इतक्या वर्षांत आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. देशातील जनतेला माहिती आहे की गेल्या ६५ वर्षांत काँग्रेसने किती भ्रष्टाचार केला आहे. बिहारमधील राजदच्या भ्रष्टाचाराबद्दल प्रत्येक मुलाला माहिती आहे. तुरुंगातूनच फायलींवर स्वाक्षरी होत होत्या. तुरुंगातूनच सरकारी आदेश जारी केले जात होते. जर नेत्यांची अशी वृत्ती असेल तर भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कशी लढता येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बिहारमधील गयाजी येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीचे वातावरण सुरू होण्यापूर्वीच बिहार बहरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने बिहारसाठी आपला खजिना उघडला आहे. या क्रमाने, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बिहारला पोहोले आहेत. इथे ते १२,९९२ कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. त्यामध्ये गंगेवरील आंता-सिमारिया जोडत असलेल्या ६ पदरी पूल समाविष्ट आहे. याशिवाय, वैशाली ते कोडरमा दरम्यान बुद्ध सर्किट ट्रेन देखील सुरू केली जाईल. ) उद्घाटन करतील. यामुळे बिहारच्या कनेक्टिव्हिटीला एक नवीन गती मिळेल आणि लाखो लोकांना दिलासा मिळेल. १८७१ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या आंता-सिमारिया या पुलाची एकूण लांबी ८.१५ किमी आहे. या पूलामुळे जड वाहनांसाठीचे अंतर १०० किमीने कमी होईल. उत्तर आणि दक्षिण बिहारला थेट जोडण्यासाठी हा पूल उपयोगी ठरेल. मोकामा-बेगुसराय दरम्यानचा प्रवास सोपा होईल. सिमारिया धाम आणि दिनकर जी यांच्या जन्मस्थळापर्यंत चांगली पोहोच यात्रेकरूंना सिमरिया धामपर्यंत सहज पोहोचता येईल. लोकांचा वेळ आणि इंधन वाचेल. पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेले प्रकल्प : १. बक्सरमध्ये ६६० मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प २. मुंगेरमध्ये सांडपाणी नेटवर्क आणि एसटीपी प्रकल्प ३. मुझफ्फरपूरमध्ये होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र ४. मोखामा-सिमारिया ४/६ लेन आणि गंगा पुलाचे बांधकाम ५. बख्तियारपूर ते मोखामा एनएच-३१ रस्त्याची सुधारणा अर्थसंकल्पात बिहारसाठीच्या घोषणा : १. मखाना शेतकऱ्यांसाठी मखाना बोर्ड २. २०१४ नंतरच्या आयआयटीमध्ये ६५०० हजार नवीन जागा ३. चार नवीन ग्रीनफील्ड विमानतळ ४. न्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन योजना ५. सिंचन सुविधेसाठी पश्चिम कोसी कालवा प्रकल्प