मुंबई – करोनाच्या अंधारावर मात करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या दारात, बाल्कनीत येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे. मात्र यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन संपूर्ण राज्यच अंधारात जाईल, अशी भीती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
नितीन राऊत म्हणाले कि, देशातील सर्वांनी एकाच वेळेस लाईट बंद केल्यास विजेची मागणी एकदम कमी होईल. आधीच वीजनिर्मिती आणि मागणी याचं गणित बिघडलं आहे. जर सर्वांना एकाच वेळी लाइट बंद केले तर परिस्थिती अजून बिकट होईल. एवढ्या लोकांनी एकाच वेळेस लाईट बंद केल्यास राज्यातील तसेच केंद्रीय ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर निकामी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा विधानांचा पुनर्विचार व्हावा. तसेच लाईट बंद न करता दिवे लावावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
If all lights are switched off at once it might lead to failure of grid. All our emergency services will fail&it might take a week’s time to restore power.I would appeal to the public to light candles&lamps without switching off lights:Nitin Raut,Maharashtra Energy Minister (3.4) pic.twitter.com/2j2gtOoJKi
— ANI (@ANI) April 4, 2020
तसेच महाराष्ट्रसारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड फेल्युअरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टी स्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील. एक पॉवर स्टेशन सर्विसमध्ये यायला साधारण १६ तास लागतात याप्रमाणे सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला साधारण एक आठवडा जाईल. म्हणून मला जनतेला सल्ला द्यायचा आहे. आपण करणाऱ्या या कृतीचा पुर्नविचार करावा, असेही आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे.