Jayant Patil : ….तर तीच तरुण पिढी तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते; जयंत पाटलांचं जाहीर सभेतून विधान “राज्यकर्त्यांना हे शहाणपणं…”
Jayant Patil : तरुणावर दिल्ली पोलिसांनी २० जुलै या दिवशी केलेल्या लाठीमार प्रकरणी राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं.

Jayant Patil : कॅाक्रोच जनता पार्टीसोबत देशातील लाखो तरुण जोडले गेले. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्यास आलेल्या या चळवळीने देशाच्या केंद्र सरकारला हादरून सोडलं. सत्ताधाऱ्यांना जाब विचारत नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरकसपणे मागणी केली आणि ती मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली. तरुणावर दिल्ली पोलिसांनी २० जुलै या दिवशी केलेल्या लाठीमार प्रकरणी राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं.
महाराष्ट्रतही याचे पडसाद बघायला मिळाले. विरोधकांनी केंद्र सरकारसह दिल्ली पोलिसांवर सडकून टीका केली. शरद पवार गटाचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. आता तरुणाविषयी बोलताना त्यांनी महत्वाचं विधान सांगलीत आयोजित एका कार्यक्रमात केलं आहे.
राज्यकर्त्यांना हे शहाणपणं सुचलं पाहिजे
“नव्या पिढीने भावना कशा व्यक्त करायच्या तो त्या पिढीचा प्रश्न आहे. तरुणांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याला चिडून न जाता त्यांना आपुलीने समजून घेतलं पाहिजे.” अशी भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली. राज्यकर्त्यांना हे शहाणपणं सुचलं पाहिजे अशी पुष्टी त्यांनी यावेळी बोलताना जोडली. कॅाक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुण रस्त्यावर उतरले होते, ही एक मोठी क्रांतीची होती, असे अनेकांकडून सांगण्यात आलं. तरुणांनी दाखवलेलं धैर्य विचार करण्याजोगे आहे. या सगळ्यावर बोलताना जयंत पाटील यांनी आपले विचार मांडले.
“विचारांची देवाणघेवाण… खुलेपणाने मांडलेले विचार… आपल्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धती… या सगळ्यांचीच गती मागच्या काही वर्षांत थांबलेली होती. आजही विचार व्यक्त करणाऱ्यांना हूडकण्याचं कार्य काही महान लोकं करताहेत; पण तो माणूस आपल्या विरोधी बोलतोय, तो का बोलतोय याचा विचार सहजासहजी करायला कोणी तयार नाही.” असं जयंत पाटील म्हणाले.
तरुण पिढीच्या मनातील अपेक्षा जर पूर्ण केल्या तर….
पुढं बोलताना ते म्हणाले ” घरात मुलं जर रुसलं चिडलं, आई वडिलांना टोकाच्या भाषेत बोललं, तरी आई वडील त्याला जवळ घेतात. त्याच्याशी आपुलकीने वागतात आणि त्याला आपलसं करून घेण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून त्याच्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा होतील. या देशातही हेच झालं पाहिजे”, असं मत त्यांनी व्यक्त केलं. “तरुणांनी रस्त्यावर येऊन राग व्यक्त केला, याचा राग मनात न धरता त्या तरुण पिढीच्या मनातील अपेक्षा जर पूर्ण केल्या, तर तीच तरुण पिढी तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते.” असं उद्वार जयंत पाटलांनी काढले.
Moscow IED Blast : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बॉम्बस्फोट ; ३ जण ठार, २१ जखमी





