Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावरील आंदोलनानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ३० मेपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आमच्या समाजाची फसवणूक करू नका, हे मी सातत्याने सांगत आहे. एवढ्या द्वेष आपल्या समजाचा का आहे? असा सवाल उपस्थित केला. तसेच सातारा गॅजेट लागू केलं नाही, म्हणून पुन्हा आंदोलन करत असल्याचे जरांगे म्हणाले. मराठ्यांनी दोन भाग केले. इथे लेकरा बाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मराठा समाजाचा द्वेष कशासाठी आहे. सरकारकडून वारंवार फसवणूक केली जात आहे. आपल्याला समजाच्या बाजुने हुशार होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. (Manoj Jarange) मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही हे प्रमाणपत्रे देण्याचे काम केले नाही, तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा. फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Manoj Jarange) Maratha Reservation तसेच फडणवीस साहेबांनीही छातीठोकपणे मी जीआर काढलाय आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र देणार, असे सांगून अभियान राबवावे असे आवाहन त्यांनी केले. तुमचे शहाणपण मी मराठ्याच्या पुढे चालू देणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे. …नाहीतर राज्यभरात भयानक आंदोलन (Manoj Jarange) गोरगरीब मराठाही हुशार आहेत ते विसरू नका. ज्या प्रमाणं मराठवाड्यातले सगळे मराठे हे कुणबी आहेत, मराठवाड्यातल्या मराठ्यांना इथून पुढच्या काळात प्रमाणपत्रावाचून फडणवीसांनी रोखू नये, सगळ्यांना कुणबींना प्रमाणपत्र द्यावीत. नाहीतर राज्यात भयानक आंदोलन होणार, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिला. प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ (Manoj Jarange) या आंदोलनाला देखील मोठ्या प्रमाणात राज्यभरातून प्रतिसाद मिळेल असा दावा मनोज जरांगेंनी केला आहे. सर्वपक्षीय मराठ्यांनी साथ द्यावी असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. मराठा समाज संकटातून मार्ग काढतोय. वारंवार लढावं लागतं हे कोणीही विसरू नका. सरकारकडून प्रमाणपत्र देण्यासाठी वारंवार टाळाटाळ केली जात आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला. जरांगेंचा मोठा दावा एका मंत्र्याने माझ्या विरोधात बोलण्यासाठी 2-2 कोटी रुपये दिले. त्यातील एक व्यक्ती इमानदार निघाला त्याने मला सांगितले, असा मोठा दावा मनोज जरांगेंनी केला. हेही वाचा : Huma Qureshi: कान्समध्ये हुमा कुरेशीचा बनारसी साडीत रॉयल अंदाज; पारंपरिक लुकने वेधलं साऱ्यांचं लक्ष