नवी दिल्ली : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या देशांतर्गत विमानसेवा मंगळवार मध्यारात्रीपासून बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. देशात कोरोनाचे सात बळी आणि 415 बाधीत झाल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला.
दि. 24 मार्चला रात्री 11 वाजून 59 मिनिटांपासून हा निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र माल वाहतूक करणाऱ्या विमानांसाठी हा नियम लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही बंदी पुढील आदेश लागू करे पर्यंत सुरू राहील, असे नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्रवक्याने सांगितले. रेल्वे आंतर राज्य बस सेवा बंद केल्यानंतर हा निर्णय घेतला.
देशभरातील 82 जिल्ह्यात पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात आंतरराष्ट्रीय विमानसेवा 29 मार्च पर्यंत बंद करण्यात आली आहे.