गोवाहटी : सरकारशी शांतता करार झाल्याच्य तीन दिवसानंतर बोडो अतिरेकी गट “एनडीएफबी’च्या 1,600 हून अधिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासमोर शस्त्रे खाली ठेवली अणि अत्मसमर्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंडच्या या निर्णयाचे स्वागत केले. जेव्हा हिंसाचाराचा मार्ग सोडून लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवला की कोणत्याही समस्येचे निराकरण शक्य आहे, याचेच हे एक स्पष्ट निदर्शक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
तर पुढाकार घेणाऱ्यांपासून इतरांना एकत्र येऊन “टीम आसाम’ साठी काम करण्याची प्रेरणा मिळेल. असा आपल्याला आत्मविश्वास असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले. याप्रसंगी एनडीएफबीच्या सदस्यांनी एके रायफल्स, लाईट मशीन गन आणि स्टेंगनसह 4,800 हून अधिक शस्त्रे खाली ठेवली.
सोमवारी सरकारने “एनडीएफबी’ आणि अन्य दोन संघटनांशी एक सामंजस्य करार केला असून याद्वारे बोडो समाजाला राजकीय व आर्थिक लाभ देण्यात आला आहे.