नवी दिल्ली – बिहारमधील 16, आसाममधील 4, उत्तर प्रदेशातील 4 आणि आंध्र प्रदेश, झारखंड ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक ठिकाणी पूरस्थिती गंभीर असून नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत आणि बिहारमध्ये 9, आसाममध्ये 9, उत्तर प्रदेशात 6, तेलंगणमध्ये 3, आंध्र प्रदेशात 2 आणि अरुणाचल प्रदेशात एक अशा 30 ठिकाणी सामान्य पूरस्थिती पेक्षा पाणी वाहत आहे.
कर्नाटकमधील 13, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी 5, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, तेलंगण आणि झारखंड येथील प्रत्येकी 3 आणि छत्तीसगड, गुजरात आणि ओडिशामधील प्रत्येकी 1 असे 41 बंधारे आणि धरणांमध्ये जमा होणाऱ्या पाणीसाठ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कृष्णा आणि तुंगभद्रा आणि भीमा यांसारख्या तिच्या उपनद्या यांच्या पाणी पातळीत सावकाश वाढ होत राहाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या खोऱ्यातील बहुतेक धरणांमधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, कर्नाटकमध्ये बागलकोट, विजयपुरा, रायचूर, बेळगाव, तेलंगणमध्ये जोगुलंबा, गडवाल आणि नालगोंडा, आंध्र प्रदेशात कुर्नुल, गुंटुर आणि कृष्णा जिल्ह्यात बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
या सर्व ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस अतिशय कडक दक्षता राखली जाणार आहे. धरणातून वाढणाऱ्या विसर्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.